Elvish Yadav : 'या' प्रकरणामुळे एल्विशच्या मागे पुन्हा ईडीचा फेरा!

मुंबई : यूट्यूबर (Youtuber) आणि बिग बॉस ओटीटी २ (Big Boss OTT 2) चा विजेता सिद्धार्थ यादव उर्फ ​एल्विश यादव (Elvish Yadav) नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी ​एल्विशने आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीमध्ये सापांच्या विषाची नशा केल्याप्रकरणी त्याला अटक केली होती. त्यावेळी काही तासाच्या चौकशीनंतर त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. कोठडीकाळ पूर्ण झाल्यानंतर तो जामीनावर सुटून बाहेर आला होता. मात्र त्याच्यावरील हे संकट अद्यापही टळले नसल्याचे दिसून येत आहे. पार्टीत नशा म्हणून सापाच्या विषाचा वापर केल्याने ईडीने एल्विश यादवला पुन्हा फेरा मारला आहे. मनी लाँड्रिंग (Money Laundering Case) प्रकरणात ईडीने एल्विशला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ​​एल्विश यादवला मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे २३ जुलै रोजी एल्विशला चौकशीसाठी लखनऊला जावे लागणार आहे. यापूर्वी ईडीने ८ जुलै रोजी नोटीस बजावली होती. मात्र एल्विशने परदेशात असल्याचे कारण देऊन काही दिवसांचा कालावधी मागितला होता. त्यानंतर ईडीने १५ दिवसांचा कालावधी वाढवून दिला आहे.


दरम्यान, चौकशी दरम्यान ईडी एल्विशच्या मालकीच्या महागड्या गाड्यांच्या ताफ्याचीही चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबत मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसच्या मालकांचीही चौकशी करणार असल्याचे समजत आहे. रेव्ह पार्ट्यांसाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केल्याचे अनेक आरोप एल्विशवर आहेत. त्यामुळे सध्या जामिनावर बाहेर असणाऱ्या एल्विशवर ईडी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला