Elvish Yadav : 'या' प्रकरणामुळे एल्विशच्या मागे पुन्हा ईडीचा फेरा!

मुंबई : यूट्यूबर (Youtuber) आणि बिग बॉस ओटीटी २ (Big Boss OTT 2) चा विजेता सिद्धार्थ यादव उर्फ ​एल्विश यादव (Elvish Yadav) नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी ​एल्विशने आयोजित केलेल्या रेव्ह पार्टीमध्ये सापांच्या विषाची नशा केल्याप्रकरणी त्याला अटक केली होती. त्यावेळी काही तासाच्या चौकशीनंतर त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावली होती. कोठडीकाळ पूर्ण झाल्यानंतर तो जामीनावर सुटून बाहेर आला होता. मात्र त्याच्यावरील हे संकट अद्यापही टळले नसल्याचे दिसून येत आहे. पार्टीत नशा म्हणून सापाच्या विषाचा वापर केल्याने ईडीने एल्विश यादवला पुन्हा फेरा मारला आहे. मनी लाँड्रिंग (Money Laundering Case) प्रकरणात ईडीने एल्विशला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ​​एल्विश यादवला मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. त्यामुळे २३ जुलै रोजी एल्विशला चौकशीसाठी लखनऊला जावे लागणार आहे. यापूर्वी ईडीने ८ जुलै रोजी नोटीस बजावली होती. मात्र एल्विशने परदेशात असल्याचे कारण देऊन काही दिवसांचा कालावधी मागितला होता. त्यानंतर ईडीने १५ दिवसांचा कालावधी वाढवून दिला आहे.


दरम्यान, चौकशी दरम्यान ईडी एल्विशच्या मालकीच्या महागड्या गाड्यांच्या ताफ्याचीही चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबत मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसच्या मालकांचीही चौकशी करणार असल्याचे समजत आहे. रेव्ह पार्ट्यांसाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केल्याचे अनेक आरोप एल्विशवर आहेत. त्यामुळे सध्या जामिनावर बाहेर असणाऱ्या एल्विशवर ईडी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

Comments
Add Comment

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट