Rikshaw-Taxi Travel : आता मुंबईकरांचा रिक्षा टॅक्सी प्रवासही महागणार!

  51

मुंबई : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने (Central Govt.) सीएनजीच्या (CNG Price Hike) दरांमध्ये प्रतिकिलोमागे १.५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर घरगुती पाईपलाईन गॅसची देखील दरवाढ जाहीर करण्यात आली. यासह पावसाच्या अतिवृष्टीमुळे भाज्यांच्या (Vegetables) दरातही मोठी वाढ झाली होती. दूध, भाज्या, फळे, तेल अशा गरजेपयोगी लागणाऱ्या गोष्टींच्या सातत्याने वाढत चाललेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडत आहे. वाढत्या महागाईत आता मुंबईकरांचा प्रवास (Expensive Travel) देखील महागण्याची चिन्हे दिसून येत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानंतर रिक्षा संघटनेनंही भाडेवाढ करण्याची मागणी उचलून धरली आहे. रिक्षा चालकांनी प्राथमिक दर २३ रुपयांवरून २५ रुपयांवर तर प्रति किमी रनिंग भाडे १५.३३ रुपयांवरून १६.९९ रुपये केले जाण्याची मागणी केली आहे. (Rikshaw-Taxi Travel Price Hike)



दोन वर्षाआधी केलेली दरवाढ


ऑक्टोबर २०२२ रोजी रिक्षाच्या दरात २१ रूपयांवरून २३ रूपये तर, टॅक्सीच्या दरात २५ रुपयांवरून २८ रुपयांची वाढ करण्यात आली होती. दरवाढ होऊन आता दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. त्यातच आता सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दीड रुपयांची वाढ झाल्याने भाडेवाढ आवश्यक असल्याचे, महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र देसाई यांनी सांगितले.


दरम्यान, रिक्षा भाडेवाढीच्या मागोमाग आता टॅक्सी युनियनही दरवाढीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय येत्या काळात घेणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.