Rikshaw-Taxi Travel : आता मुंबईकरांचा रिक्षा टॅक्सी प्रवासही महागणार!

मुंबई : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने (Central Govt.) सीएनजीच्या (CNG Price Hike) दरांमध्ये प्रतिकिलोमागे १.५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर घरगुती पाईपलाईन गॅसची देखील दरवाढ जाहीर करण्यात आली. यासह पावसाच्या अतिवृष्टीमुळे भाज्यांच्या (Vegetables) दरातही मोठी वाढ झाली होती. दूध, भाज्या, फळे, तेल अशा गरजेपयोगी लागणाऱ्या गोष्टींच्या सातत्याने वाढत चाललेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडत आहे. वाढत्या महागाईत आता मुंबईकरांचा प्रवास (Expensive Travel) देखील महागण्याची चिन्हे दिसून येत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानंतर रिक्षा संघटनेनंही भाडेवाढ करण्याची मागणी उचलून धरली आहे. रिक्षा चालकांनी प्राथमिक दर २३ रुपयांवरून २५ रुपयांवर तर प्रति किमी रनिंग भाडे १५.३३ रुपयांवरून १६.९९ रुपये केले जाण्याची मागणी केली आहे. (Rikshaw-Taxi Travel Price Hike)



दोन वर्षाआधी केलेली दरवाढ


ऑक्टोबर २०२२ रोजी रिक्षाच्या दरात २१ रूपयांवरून २३ रूपये तर, टॅक्सीच्या दरात २५ रुपयांवरून २८ रुपयांची वाढ करण्यात आली होती. दरवाढ होऊन आता दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. त्यातच आता सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दीड रुपयांची वाढ झाल्याने भाडेवाढ आवश्यक असल्याचे, महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र देसाई यांनी सांगितले.


दरम्यान, रिक्षा भाडेवाढीच्या मागोमाग आता टॅक्सी युनियनही दरवाढीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय येत्या काळात घेणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी