Rikshaw-Taxi Travel : आता मुंबईकरांचा रिक्षा टॅक्सी प्रवासही महागणार!

मुंबई : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने (Central Govt.) सीएनजीच्या (CNG Price Hike) दरांमध्ये प्रतिकिलोमागे १.५ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर घरगुती पाईपलाईन गॅसची देखील दरवाढ जाहीर करण्यात आली. यासह पावसाच्या अतिवृष्टीमुळे भाज्यांच्या (Vegetables) दरातही मोठी वाढ झाली होती. दूध, भाज्या, फळे, तेल अशा गरजेपयोगी लागणाऱ्या गोष्टींच्या सातत्याने वाढत चाललेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. त्यात आता आणखी एका गोष्टीची भर पडत आहे. वाढत्या महागाईत आता मुंबईकरांचा प्रवास (Expensive Travel) देखील महागण्याची चिन्हे दिसून येत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानंतर रिक्षा संघटनेनंही भाडेवाढ करण्याची मागणी उचलून धरली आहे. रिक्षा चालकांनी प्राथमिक दर २३ रुपयांवरून २५ रुपयांवर तर प्रति किमी रनिंग भाडे १५.३३ रुपयांवरून १६.९९ रुपये केले जाण्याची मागणी केली आहे. (Rikshaw-Taxi Travel Price Hike)



दोन वर्षाआधी केलेली दरवाढ


ऑक्टोबर २०२२ रोजी रिक्षाच्या दरात २१ रूपयांवरून २३ रूपये तर, टॅक्सीच्या दरात २५ रुपयांवरून २८ रुपयांची वाढ करण्यात आली होती. दरवाढ होऊन आता दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. त्यातच आता सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दीड रुपयांची वाढ झाल्याने भाडेवाढ आवश्यक असल्याचे, महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र देसाई यांनी सांगितले.


दरम्यान, रिक्षा भाडेवाढीच्या मागोमाग आता टॅक्सी युनियनही दरवाढीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय येत्या काळात घेणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मुंबईत पाण्याची समस्या, नगरसेवकांनी सुरु झाली रडारड

स्थायी समितीत विशेष सभेचे आयोजन करण्याचे अध्यक्षांचे आश्वासन मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व

सिध्दार्थ रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास संथगतीने, महापौरांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई :  गोरेगाव (पश्चिम) येथील सिद्धार्थ रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाची महापौर रितू तावडे यांनी अचानक

भांडुप रेल्वेवरील पुलाचे बांधकाम ३१ जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण होणार

आयआयटीकडून आराखड्याची पडताळणी मुंबई : भांडुप रेल्वेवरील भांडुप पूर्व आणि पश्चिम यांना थेट जोडणारा पूल वीर