Water Crisis : शहापूर गावात ४ वर्षांपासून पाणी नसल्याने ग्रामस्थ आक्रमक!

अलिबाग : तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शहापूर (Shahapur) गावात गेल्या चार वर्षांपासून पिण्याचे पाणी येत (Water Supply) नसल्याने पाणी विकतचे आणावे लागते. यापुढे प्रत्यक्ष नळाद्वारे पिण्याचे पाणी घरात येईपर्यंत रायगड (Raigad) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांना एक हजार स्मरणपत्रे पाठविण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक ग्रामस्थ राजन भगत यांनी घेतला आहे.


राजन भगत यांनी तसे पत्र ८ जुलै रोजी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांना पाठविले. आदर्शनगर या भागात मुख्य रस्त्यापासून १० मीटर अंतरावर आहे. त्याची नळजोडणी जलवाहिनीच्या ज्या सर्व्हिस लाईनवर होती, ती सर्व्हिस लाईन ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाने न सांगता काढून नेली. तेंव्हापासून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी येणे बंद झाले. हे ग्रामस्थ सर्वचजण वरिष्ठ नागरिक व निवृत्त शिक्षक असल्याने रोजच्या गरजेसाठी दर १५ दिवसांनी पाणी विकत घेतात.


सर्व्हिस लाईन व जलजीवन याचा काडीमात्र संबंध नसल्याचे सांगताना भारतीय राज्य घटनेतील कलम २१ अन्वये प्राप्त मुलभूत अधिकारात आम्हाला पिण्याचे पाणी मिळण्याचा अधिकार नमूद आहे. सर्वच जण आमच्या प्राप्त मूलभूत अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असून, आमच्या जगण्याच्या अधिकारावर गदा आणत आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांच्याकडे नव्याने तक्रार दाखल केल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment

Pune Building Collapsed : मुसळधार पावसात भीषण दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली; १४ जण अडकल्याची भीती

पुणे : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पुणे जिल्ह्यात मोठी

Andheri Tree Fall : मुंबईत आणखी एक दुर्घटना! अंधेरीत फांदी कोसळून पादचारी गंभीर जखमी

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. अंधेरी पूर्व

Chandrashekhar Bawankule : राज्यातील २ लाख आदिवासींना मिळणार 'सातबारा'

- वनपट्टाधारकांसाठी 'नमुना ७ ई आणि १२ ई' लागू; महसूलमंत्र्यांची विधानसभेत ऐतिहासिक घोषणा मुंबई : राज्यातील लाखो

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन

Pune Rain : मुसळधार पावसाचा फटका! भीमाशंकरचा संपर्क तुटला; दोन्ही प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद

पुणे : पुणे (Pune) जिल्हा आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या

Wadala building collapse : वडाळ्यात इमारतीचा पहिला मजला कोसळला; तिघेजण किरकोळ जखमी

मुंबई: मुंबईतील वडाळा (Wadala)(पूर्व) परिसरात मंगळवारी इमारतीचा पहिला मजला कोसळल्याची घटना घडली. शांतीनगर येथील