Crime : पालघरच्या ग्रामीण भागात हत्याच्या घटनांमध्ये वाढ

पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था पार ढासळली आहे. दिवसागणिक हत्या, लूटमार व अपहरण, अशा घटना सतत वाढत आहेत. सोमवारी मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. ही महिला वेडसर होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.


दुसरी घटना डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नवरा बायकोच्या किरकोळ वादातून एका महिलेने आपल्या साडेचार महिन्याच्या मुलीचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्या महिलेने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. नवरा तिला फिरायला घेऊन जात नाही, यावरून या नवरा बायकोमध्ये खटके उडत असत.


काल तिचा नवरा मित्रांसोबत पुन्हा फिरायला गेल्यामुळे तिचा संताप अनावर झाला व तिच्याकडून ही आततायी घटना घडली. या दोन्ही प्रकरणी मनोर व कासा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

हजारो शिक्षकांना दिलासा! शाळा बंद पडणार नाहीत, पटसंख्येची अट होणार शिथील

मुंबई: कमी पटसंख्या असल्याचं कारण देत राज्यभरातील ७०० मराठी शाळा बंद पडण्याची आणि २५ हजारांपेक्षा अधिक

मुंबई पालिकेच्या दत्तक वस्ती योजनेतील गैरव्यवहाराचे ऑडिट होणार

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची विधानसभेत घोषणा मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी

आता आधार कार्डची झेरॉक्स बंद!

फक्त डिजिटल पडताळणीसाठी अनिवार्य मुंबई : सरकारने आधार कार्ड संदर्भात मोठा निर्णय घेतला असून लवकरच नवीन नियम

फिल्म बनवण्याच्या नावाखाली डॉक्टरची कोट्यवधींची फसवणूक

दिग्दर्शक विक्रम भट्ट यांना अटक मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यावर उदयपूरमधील एका डॉक्टरकडून

नगरविकाससोबतची कांजूरमार्ग कचराभूमी बैठक निष्फळ

११ डिसेंबरच्या न्यायलयीन सुनावणीकडे लक्ष मुंबई : कांजूरमार्ग कचराभूमीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या

खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या, दैनंदिन कामाचे तासही वाढणार

मुंबई : महाराष्ट्रातील खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महायुतीने दिलासा दिला आहे. महायुती