Crime : पालघरच्या ग्रामीण भागात हत्याच्या घटनांमध्ये वाढ

पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था पार ढासळली आहे. दिवसागणिक हत्या, लूटमार व अपहरण, अशा घटना सतत वाढत आहेत. सोमवारी मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. ही महिला वेडसर होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.


दुसरी घटना डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नवरा बायकोच्या किरकोळ वादातून एका महिलेने आपल्या साडेचार महिन्याच्या मुलीचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्या महिलेने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. नवरा तिला फिरायला घेऊन जात नाही, यावरून या नवरा बायकोमध्ये खटके उडत असत.


काल तिचा नवरा मित्रांसोबत पुन्हा फिरायला गेल्यामुळे तिचा संताप अनावर झाला व तिच्याकडून ही आततायी घटना घडली. या दोन्ही प्रकरणी मनोर व कासा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास

'बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’ ठरवणार'

मुंबई : राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवांवरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा

अचानक डिजिटल ब्लॅकआउट; Cloudflare बंद पडताच अनेक अ‍ॅप्स ठप्प !

मुंबई : जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना आज सकाळपासून अचानक अनेक डिजिटल सेवांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ३ साठी पादचारी कनेक्टिव्हिटी मजबूत; वरळी व BKC येथे उभारले जाणार दोन मोठे सबवे

मुंबई : मुंबईतील ‘अक्वा लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो लाईन ३ च्या प्रवाशांना अधिक सुलभ आणि सुरक्षित

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, छोटे भूखंड आता 'विनाशुल्क' नियमित होणार

मुंबई : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित व कायदेशीर करण्यासाठी आवश्यक