७ राज्यांतील १३ विधानसभेच्या जागांवर आज पोटनिवडणूक, NDA की INDIA कोणाचे पारडे होणार जड?

नवी दिल्ली: देशभरात ७ राज्यांतील रिकाम्या असलेल्या १३ विधानसभेच्या जागांवर आज पोटनिवडणूक होत आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी मतदान सुरू होत आहे. याचे निकाल १३ जुलैला येतील. लोकसभा निवडणुकीत इंडिया गठबंधनाच्या चांगल्या कामगिरीनंतर सत्ताधारी एनडीए पक्षाला चांगली टक्कर मिळू शकते.



कोणत्या राज्यांत किती जागांवर पोटनिवडणूक?


बिहारच्या रूपौली, पश्चिम बंगालमधील रायगंज, रानाघाट दक्षिण, बगदा, मणिकताला, तामिळनाडूच्या विक्रावंदी, मध्य प्रदेशातील अमरवाडा, उत्तराखंडमधील बद्रीनाथ, मंगलौर, पंजाबमधील जालंध वेस्ट, हिमाचलमधील देहरा, हमीरपूर, नालागढ येथील जागांवर १० जुलैला मतदान होत आहे. हा जागा लोकसभा निवडणूक अथवा तेथील आमदारांच्या निधनामुळे रिक्त झाल्या आहेत.


तर यूपीमधील करहल, कटेहरी, कुंदरकी, गाझियाबाद, खैर, मीरापूर, फुलपूक, मझवा आणि सीसामऊ येथील जागांवर पोटनिवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशात ९ आमदार खासदार बनले आहेत आणि तर समाजवादी पक्षाचे एक आमदार इरफान सोलंकी यांचे सदस्यत्व गेले यामुळे कानपूरच्या सीसामऊ विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.

Comments
Add Comment

हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते