अनधिकृत ४१ इमारती पाडण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

नुकसानभरपाई द्यावी; रहिवाशांकडून मागणी


पालघर : नालासोपारा (Nalasopara) पूर्वेस अग्रवाल नगरी येथे आरक्षित जागेवर असलेल्या ४१ अनधिकृत इमारती (Unauthorized Buildings) पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महापालिकेला (Virar Municipality) दिल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. मालकी तसेच पालिकेच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमण करून या इमारती बांधण्यात आल्या आहेत.


बनावट सी.सी.आरक्षित जमिनीवर इमारती उभारणे, खोटी दस्तऐवज बनवणे व वसुली, अशा विविध प्रकरणामुळे बदनाम असलेल्या वसई विरार शहर मनपा क्षेत्रात आणखी जमीन घोटाळा उघडकीस आला. डम्पिंग व सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या ३० एकर भूखंडावर भूमाफियांनी ४१ अनधिकृत इमारती उभारल्या. या प्रकरणी शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. अग्रवाल नगरी येथे भूमापन क्रमांक २२ ते ३० पर्यंतचा ३० एकरचा भूखंड होता. यामधील काही भूखंड खासगी तर काही भूखंड हे डंपिंग ग्राऊंड आणि सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. २००६ मध्ये ही जमीन बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता व त्यांचे पुतणे अरुण गुप्ता यांनी ही जागा बळकावून जमिनीवर बेकायदा इमारती बांधण्यास सुरुवात केली होती. बनावट बांधकाम परवानगी (सी.सी.) आणि भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) बनवून तसेच इतर कागदपत्रांच्या सहाय्याने या अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या आहेत.


२०१० ते २०१२ या दोन वर्षांच्या कालावधीत एकूण ४१ अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या. या त्याच्याविरोधात जमीन मालक अजय शर्मा यांनी उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली होती. त्यानुसार महापालिकेने या इमारती मधील रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणात माजी नगरसवेक सिताराम गुप्ता,अरूण गुप्ता यांच्यासह चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.


सिताराम गुप्ता याला अटकही करण्यात आली होती. आम्ही १५ वर्षांपासून या प्रकरणी न्यायासाठी लढा देत आहोत. आमची जमीन बळकावली तेव्हापासून सतत तक्रारी करत होतो. खोट्या कागदपत्रांच्या आधारे अनधिकृत इमारती उभ्या रहात होत्या, तेव्हा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. न्यायालयाचा हा निर्णय दिलासा देणारा आहे,
असे याचिकाकर्ते अजय शर्मा यांनी सांगितले.



इमारतीमधील सदनिका, अधिकृत घरे असल्याचे सांगून फसवणूक


या ४१ इमारतींमध्ये २ हजारांहून अधिक नागरिक राहत आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे रहिवाशी मात्र हवालदील झाले आहेत. दरम्यान बिल्डरांनी आमची फसवणूक केली असून त्याची मालमत्ता जप्त करून त्यातून या रहिवाशांना नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महानगरपालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा