Vegetable Price Hike : मुसळधार पावसाचा भाजीपाल्यावर फटका!

छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने (Heavy Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणी तुडुंब भरले असून शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवरही झाला आहे. सर्वसामान्यांना एकीकडे वाढत्या महागाईचा फटका बसत असताना आता त्यात मुसळधार पावसाचीही भर पडत आहे. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजीपाल्यांची (Vegetable Price Hike) आवक कमी मोठ्या प्रमाणात घटल्याने भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत असून त्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा फटका बसलेला शेतमाल बाजारात येत आहे. तसेच आवक कमी झाल्याने काही दिवसांपासून भाजीपाल्यांच्या दरातही वाढ झाली आहे. टोमॅटो, मिरची, भेंडी, आणि फुलकोबी याचे दर हे १०० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. तर कांदे आणि बटाटे ६० ते ७० रुपये पर्यंत आहे. भर पावसाळ्यात भाज्यांच्या दरांनी घाम फोडला असल्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट (Kitchen Budget) कोलमडले आहे. दरम्यान, भाजीपाल्याची आवक वाढल्यानंतर भाज्यांचे दर पुन्हा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी