RBI Action : आरबीआयचा अ‍ॅक्शन मोड! 'या' दोन कंपन्यांची नोंदणी केली रद्द

जाणून घ्या नेमके प्रकरण काय


मुंबई : एकीकडे आरबीआय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर कठोर (RBI Action) कारवाई करताना दिसत आहे. तर दुसरीकडे आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांनाही आरबीआयने अ‍ॅक्शन मोड दाखवला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्ज देण्याच्या अनियमित पद्धतींमुळे स्टार फिनसर्व्ह इंडिया आणि पॉलिटेक्स इंडिया या दोन नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांची (NBFC) नोंदणी प्रमाणपत्रे (COR) रद्द केली आहेत.


केंद्रीय बँकेने दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील स्टार फिनसर्व्ह इंडिया 'प्रोगकॅप' (डेसिडेराटा इम्पॅक्ट व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आणि संचालित) अंतर्गत सेवा पुरवत होती. पॉलीटेक्स इंडिया, मुंबईत मुख्यालय असलेले, 'Z2P' मोबाइल ऍप्लिकेशन (Zytek Technologies Pvt. Ltd.) अंतर्गत सेवा पुरवत होती. या कंपनीने कर्ज मूल्यांकन, कर्ज मंजूरी तसेच KYC पडताळणी प्रक्रिया यासारख्या सेवा आउटसोर्स केल्या आहेत. त्यामुळे या कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे.


त्याचबरोबर, पॉलिटेक्स इंडिया कंपनीने केव्हायसी (KYC) पडताळणी, क्रेडिट मूल्यांकन, कर्ज वाटप, कर्ज वसुली, कर्जदारांचा पाठपुरावा आणि कर्जदारांच्या तक्रारींची दखल घेणे व त्यांचे निराकरण करणे यासंबंधीचे मुख्य निर्णय घेण्याचे काम आउटसोर्सिंग करताना नियमांचे उल्लंघन केले. तर काही प्रकरणांमध्ये त्यांनी सेवा पुरवठादाराकडून जास्त व्याज देखील घेतले. या सर्व क्रिया आरबीआयच्या फेअर प्रॅक्टिस कोड (FPC) मार्गदर्शक तत्त्वांच्या विरुद्ध असल्यामुळे या कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.


दरम्यान, नोंदणी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे या दोन्ही संस्थांना यापुढे नॉन-बँकिंग वित्तीय संस्थेचा (NBFI) व्यवसाय करता येणार नाही, असे आरबीआयने म्हटले आहे.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे