RBI Action : आरबीआयचा अ‍ॅक्शन मोड! 'या' दोन कंपन्यांची नोंदणी केली रद्द

जाणून घ्या नेमके प्रकरण काय


मुंबई : एकीकडे आरबीआय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर कठोर (RBI Action) कारवाई करताना दिसत आहे. तर दुसरीकडे आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांनाही आरबीआयने अ‍ॅक्शन मोड दाखवला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्ज देण्याच्या अनियमित पद्धतींमुळे स्टार फिनसर्व्ह इंडिया आणि पॉलिटेक्स इंडिया या दोन नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांची (NBFC) नोंदणी प्रमाणपत्रे (COR) रद्द केली आहेत.


केंद्रीय बँकेने दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद येथील स्टार फिनसर्व्ह इंडिया 'प्रोगकॅप' (डेसिडेराटा इम्पॅक्ट व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आणि संचालित) अंतर्गत सेवा पुरवत होती. पॉलीटेक्स इंडिया, मुंबईत मुख्यालय असलेले, 'Z2P' मोबाइल ऍप्लिकेशन (Zytek Technologies Pvt. Ltd.) अंतर्गत सेवा पुरवत होती. या कंपनीने कर्ज मूल्यांकन, कर्ज मंजूरी तसेच KYC पडताळणी प्रक्रिया यासारख्या सेवा आउटसोर्स केल्या आहेत. त्यामुळे या कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द केले आहे.


त्याचबरोबर, पॉलिटेक्स इंडिया कंपनीने केव्हायसी (KYC) पडताळणी, क्रेडिट मूल्यांकन, कर्ज वाटप, कर्ज वसुली, कर्जदारांचा पाठपुरावा आणि कर्जदारांच्या तक्रारींची दखल घेणे व त्यांचे निराकरण करणे यासंबंधीचे मुख्य निर्णय घेण्याचे काम आउटसोर्सिंग करताना नियमांचे उल्लंघन केले. तर काही प्रकरणांमध्ये त्यांनी सेवा पुरवठादाराकडून जास्त व्याज देखील घेतले. या सर्व क्रिया आरबीआयच्या फेअर प्रॅक्टिस कोड (FPC) मार्गदर्शक तत्त्वांच्या विरुद्ध असल्यामुळे या कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.


दरम्यान, नोंदणी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे या दोन्ही संस्थांना यापुढे नॉन-बँकिंग वित्तीय संस्थेचा (NBFI) व्यवसाय करता येणार नाही, असे आरबीआयने म्हटले आहे.

Comments
Add Comment

ईपीएफओचा मोठा निर्णय, पीएफ खात्यातून १००% रक्कम काढण्याची परवानगी

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सात कोटींहून अधिक सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओच्या

‘गलिच्छ शौचालयाची तक्रार करा आणि FASTag मध्ये ₹१,००० रिचार्ज मिळवा’

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने देशातील महामार्गांवर स्वच्छता आणि चांगली सुविधा सुनिश्चित

भारत ब्रह्मपुत्रा नदीवर तयार करणार जलसाठा प्रकल्प

चीनच्या ७७ अब्ज डॉलर्सच्या हायड्रो प्रकल्पाला देणार प्रत्युत्तर नवी दिल्ली : ब्रह्मपुत्र नदीवर चीनने सुरू

देशाची 'स्पेसटेक'मध्ये ऐतिहासिक झेप

भारताचा पहिला खासगी उपग्रह मिशन दृष्टी लवकरच प्रक्षेपित नवी दिल्ली :भारताची आघाडीची अवकाश-तंत्रज्ञान

आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव कुटुंबाच्या अडचणीत वाढ

न्यायालयाने आरोप केले निश्चित नवी दिल्ली :बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारी दरम्यान, आयआरसीटीसी घोटाळा

हे भाजपा सरकार आहे, जे बोलतो ते करतो - अमित शाह

जयपूर : “हे भाजप सरकार आहे, काँग्रेस सरकार नाही. आम्ही जे बोलतो ते करतो”, असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा