Air Kerala : हवाई प्रवास होणार आणखी स्वस्त! लवकरच सुरु होणार 'ही' नवी विमानसेवा

मुंबई : भारतीय प्रवासी लवकरच कमी किमतीत हवाई प्रवास करु शकणार आहेत. दुबईमधील (Dubai) दोन व्यावसायिकांद्वारे नवी एअरलाइन (Airline) सुरु करण्यात आली आहे. सध्या परदेशात असणाऱ्या या विमानसेवेला सरकारकडून मंजूरी मिळाल्यानंतर पुढील वर्षातच ही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच भारतातही दाखल होणार असल्याचे कंपनीच्या संस्थापकांनी सांगितले. त्यामुळे हवाई प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 'एअर केरळ' (Air Kerala) असे नव्या विमानसेवेचे नाव असून या एअरलाइनच्या सुरुवातीला तीन एटीआर ७२- ६०० विमाने वापरण्यात येणार आहेत. त्यानंतर ही एअरलाइन देशातील श्रेणी २ आणि श्रेणी ३ सारख्या छोट्या शहरांना जोडण्यात येणार आहे. सध्या जेटफ्लाय एव्हिएशन या नावाने नोंदणीकृत विमान कंपनीला हवाई वाहतूक सेवा चालवण्यास ३ वर्षांची मान्यता देण्यात आली आहे, असे कंपनीने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.



दोन उद्योगपतींचा पाठिंबा


एअर केरळ ही विमानसेवा भारताच्या दक्षिण भागातील पहिली प्रादेशिक विमानसेवा असणार आहे. केरळ सरकारने २००५ साली पहिल्यांदा या विमान कंपनीची योजना आखली होती. त्यानंतर तब्बल १९ वर्षानंतर ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी दुबईतील अफी अहमद आणि अयुब कल्लाडा या दोन मोठ्या उद्योगपतींचा पाठिंबा मिळाला आहे.



आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची योजना


एअर केरळ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यापूर्वी प्रादेशिक उड्डाणे सुरू करण्याचा विचार करत आहे. एअर केरळच्या ताफ्यात २० विमाने आल्यानंतर ही एअरलाइन आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करू शकते. सध्या ही सेवा दुबईमध्येच सुरु असणार असून नंतर इतर मार्गांवरही सुरू करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या

भारत-ब्रिटनमध्ये 'व्हिजन २०३५' वर निर्णायक चर्चा! PM मोदी 'या' खास पाहुण्याचं करणार स्वागत

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा पहिला भारत दौरा; फिनटेक आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष मुंबई: पंतप्रधान