Air Kerala : हवाई प्रवास होणार आणखी स्वस्त! लवकरच सुरु होणार 'ही' नवी विमानसेवा

  278

मुंबई : भारतीय प्रवासी लवकरच कमी किमतीत हवाई प्रवास करु शकणार आहेत. दुबईमधील (Dubai) दोन व्यावसायिकांद्वारे नवी एअरलाइन (Airline) सुरु करण्यात आली आहे. सध्या परदेशात असणाऱ्या या विमानसेवेला सरकारकडून मंजूरी मिळाल्यानंतर पुढील वर्षातच ही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच भारतातही दाखल होणार असल्याचे कंपनीच्या संस्थापकांनी सांगितले. त्यामुळे हवाई प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, 'एअर केरळ' (Air Kerala) असे नव्या विमानसेवेचे नाव असून या एअरलाइनच्या सुरुवातीला तीन एटीआर ७२- ६०० विमाने वापरण्यात येणार आहेत. त्यानंतर ही एअरलाइन देशातील श्रेणी २ आणि श्रेणी ३ सारख्या छोट्या शहरांना जोडण्यात येणार आहे. सध्या जेटफ्लाय एव्हिएशन या नावाने नोंदणीकृत विमान कंपनीला हवाई वाहतूक सेवा चालवण्यास ३ वर्षांची मान्यता देण्यात आली आहे, असे कंपनीने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.



दोन उद्योगपतींचा पाठिंबा


एअर केरळ ही विमानसेवा भारताच्या दक्षिण भागातील पहिली प्रादेशिक विमानसेवा असणार आहे. केरळ सरकारने २००५ साली पहिल्यांदा या विमान कंपनीची योजना आखली होती. त्यानंतर तब्बल १९ वर्षानंतर ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी दुबईतील अफी अहमद आणि अयुब कल्लाडा या दोन मोठ्या उद्योगपतींचा पाठिंबा मिळाला आहे.



आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची योजना


एअर केरळ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यापूर्वी प्रादेशिक उड्डाणे सुरू करण्याचा विचार करत आहे. एअर केरळच्या ताफ्यात २० विमाने आल्यानंतर ही एअरलाइन आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करू शकते. सध्या ही सेवा दुबईमध्येच सुरु असणार असून नंतर इतर मार्गांवरही सुरू करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )