Nagpur News : पत्नीच्या उपचारासाठी पैशांची चणचण; पतीने उचलले धक्कादायक पाऊल!

नागपूर : केरळ (Keral) राज्यातून आलेल्या कॅन्सर (Cancer) पीडित पत्नीच्या उपचारासाठी एक कुटुंब नागपूर शहरात (Nagpur News) दाखल झाले होते. नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात पीडित महिलेच्या उपचारादरम्यान पैशांची कमी भासल्याने पतीने त्याच्या मुलीसह स्वतःचा व पत्नीचा जीव घेण्याचा टोकाचा पाऊल उचलला. यामध्ये पती पत्नीचा मृत्यू झाला. मात्र मुलीचा थोडक्यात बचाव झाला असून तिच्यावर इंदिरा गांधी (मेयो) रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्व प्रकारमुळे संपूर्ण रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही खळबळजनक घटना नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाणे (Jaripatka Police Station) हद्दीतील विजयश्री नगर येथे घडली आहे. केरळ येथील पीडित महिला प्रिया नायर (३४) ही रक्ताच्या कर्करोग आजाराने ग्रासली होती. उपचारासाठी तिला नागपुरातील एका खासगी पण महागड्या रुग्णालयात आणले होते. महागडे रुग्णालय असल्यामुळे दर आठवड्यात हजारो रुपयांचा खर्च होत होता. मध्यम वर्गीय परिस्थिती असल्यामुळे पीडित महिलेचा पती रीजु नायर (४५) हे आर्थिक संकटात सापडले होते. उधार घेतलेले पैसेही संपल्यानंतर त्यांच्या डोक्यावर कर्जाचा भार निर्माण झाला होता. अशातच उपचारादरम्यान डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घेण्यासाठी पैसे शिल्लक नसल्यामुळे रीजु नायर यांनी पत्नी आणि मुलीला शीतपेयातून विष दिले. त्यानंतर स्वतः ही विषयुक्त शीतपेय घेवून आत्महत्या केली. परंतु यात रीजु नायर यांची १२ वर्षीय मुलीचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.



नेमके काय घडले?


रीजु नायर यांनी पत्नी प्रियाला शीतपेयामध्ये विष घालून पिण्यासाठी दिले. त्यानंतर तेच शीतपेय १२ वर्षीय मुलगी वैष्णवीला दिल्यानंतर स्वतःही विष घेतले. वैष्णवीने ते शीतपेय प्यायल्यानंतर काही वेळात तिने उलट्या केल्या, त्यामुळे तिच्या पोटात गेलेले विष बाहेर पडले आणि ती थोडक्यात बचावली. सध्या तिच्यावर नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. परंतु या सर्व प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण रुग्णालय हादरुन गेले आहे.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना