Lal Krishna Advani : लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज! प्रकृती स्थिर

घरी आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला


नवी दिल्ली : भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात (AIMS Hospital) दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार वयासंबंधी तक्रारी वाढल्याने त्यांना मागील आठवड्यात रुग्णालयात करण्यात आले होते. यावेळी किरकोळ शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. परंतु पुन्हा प्रकृती खालावल्याने बुधवारी रात्री ९ वाजता त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. काल सायंकाळी पाच वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते घरीच आराम करत आहेत.


लालकृष्ण अडवाणी यांना गेल्या आठवड्यात २६ जून रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना यूरोलॉजी विभागाचे डॉ. अमलेश सेठ यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. अडवाणी यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.


त्यानंतर वयोमानाच्या त्रासामुळे त्यांना पुन्हा बुधवारी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने बुलेटिन जारी केले होते. ते न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या निरीक्षणाखाली होते. आज त्यांना अखेर डिस्चार्ज देण्यात आला व घरी आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



अडवाणी यांना ३१ मार्च रोजी भारतरत्न प्रदान


लालकृष्ण अडवाणी यांना ३१ मार्च रोजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, गृहमंत्री अमित शहा आणि माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू उपस्थित होते. ३ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. यापूर्वी २०१५ मध्ये अडवाणी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.


Comments
Add Comment

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी