Lal Krishna Advani : लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज! प्रकृती स्थिर

घरी आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला


नवी दिल्ली : भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात (AIMS Hospital) दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार वयासंबंधी तक्रारी वाढल्याने त्यांना मागील आठवड्यात रुग्णालयात करण्यात आले होते. यावेळी किरकोळ शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. परंतु पुन्हा प्रकृती खालावल्याने बुधवारी रात्री ९ वाजता त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. काल सायंकाळी पाच वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते घरीच आराम करत आहेत.


लालकृष्ण अडवाणी यांना गेल्या आठवड्यात २६ जून रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना यूरोलॉजी विभागाचे डॉ. अमलेश सेठ यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. अडवाणी यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.


त्यानंतर वयोमानाच्या त्रासामुळे त्यांना पुन्हा बुधवारी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने बुलेटिन जारी केले होते. ते न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या निरीक्षणाखाली होते. आज त्यांना अखेर डिस्चार्ज देण्यात आला व घरी आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



अडवाणी यांना ३१ मार्च रोजी भारतरत्न प्रदान


लालकृष्ण अडवाणी यांना ३१ मार्च रोजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, गृहमंत्री अमित शहा आणि माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू उपस्थित होते. ३ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. यापूर्वी २०१५ मध्ये अडवाणी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.


Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा