Lal Krishna Advani : लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज! प्रकृती स्थिर

घरी आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला


नवी दिल्ली : भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात (AIMS Hospital) दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार वयासंबंधी तक्रारी वाढल्याने त्यांना मागील आठवड्यात रुग्णालयात करण्यात आले होते. यावेळी किरकोळ शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. परंतु पुन्हा प्रकृती खालावल्याने बुधवारी रात्री ९ वाजता त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. काल सायंकाळी पाच वाजता दिल्लीतील अपोलो रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते घरीच आराम करत आहेत.


लालकृष्ण अडवाणी यांना गेल्या आठवड्यात २६ जून रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना यूरोलॉजी विभागाचे डॉ. अमलेश सेठ यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. अडवाणी यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.


त्यानंतर वयोमानाच्या त्रासामुळे त्यांना पुन्हा बुधवारी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने बुलेटिन जारी केले होते. ते न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या निरीक्षणाखाली होते. आज त्यांना अखेर डिस्चार्ज देण्यात आला व घरी आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



अडवाणी यांना ३१ मार्च रोजी भारतरत्न प्रदान


लालकृष्ण अडवाणी यांना ३१ मार्च रोजी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, गृहमंत्री अमित शहा आणि माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू उपस्थित होते. ३ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली होती. यापूर्वी २०१५ मध्ये अडवाणी यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.


Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च