Hathras Stampede : दुर्घटनेनंतर भोलेबाबा पहिल्यांदाच माध्यमांसमोर; म्हणाला मृत परिवाराच्या लोकांना...

लखनऊ : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये भोलेबाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी (Hathras Stampede) होऊन भीषण दुर्घटना घडली होती. यामध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला असून १०० जण जखमी झाले होते. मात्र या दुर्घटनेनंतर नारायण साकार हरि उर्फ भोलेबाबा (Bholebaba) फरार झाले होते. पोलीस या फरार भोलेबाबाचा शोध घेत असताना अनेक प्रकार उघडकीस येत होते. अशातच फरार भोलेबाबा पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर आला असून त्याने हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली. त्यासोबत हाथरस दुर्घटनेमधील मृत परिवाराच्या लोकांना मदत करणार असल्याचेही त्याने म्हटले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हाथरस प्रकरणातील भोलेबाबा दुर्घटना झाल्यापासून अज्ञातवासात असून या घटनेतील मुख्य आयोजक फरार होता. सध्या उत्तर प्रदेश पोलिसांनी दुर्घटनेतील मुख्य आयोजक देवप्रकाश मधुकर याला अटक केली आहे. तर भोलेबाबानेही पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर येऊन आपली प्रतिक्रिया मांडली आहे.



काय म्हणाला भोलेबाबा?


मंगळवार २ जुलै रोजी घडलेल्या हाथरस प्रकरणात १२१ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी देखील झाले. याप्रकरणानंतर भोलेबाबांनी शोक व्यक्त केला. त्यासोबत सर्वांनी शासनावर विश्वास ठेवावा. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना सोडले जाणार नाही. मृत परिवाराच्या लोकांनाही मदत केली जाणार असल्याचे आश्वासन भोलेबाबांनी यावेळी दिले.



मुख्य आयोजकाला अटक


हाथरस दुर्घटनेतील प्रमुख आयोजक आणि मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर फरार झाला होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी एक लाख रूपयांचे बक्षिसही जाहीर केले होते. परंतु देवप्रकाशने स्वतःहून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आज त्याला कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.

Comments
Add Comment

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा

IIT Roorkee : 'राजकीय आंदोलनांना सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका'; IIT च्यामोठ्या निर्णयाची देशभरात चर्चा

रुडकी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या एका अंतर्गत