Virat Kohli: तो जगातील आठवे आश्चर्य, मी सही करायला तयार...बुमराहच्या कौतुकादरम्यान पहा काय म्हणाला कोहली

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४मद्ये दक्षिण आफ्रिकेला हरवत टीम इंडिया मायदेशात परतली आहे. टीम इंडिया ४ जुलैला सकाळी ६ वाजून९ मिनिटांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली होती.


यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. येथे चॅम्पियन्स आणि टी-२० वर्ल्डकप ट्रॉफीची विजयी मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत लाखोंच्या संख्येने चाहते होते. यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये चॅम्पियन्ससाठी कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात विराट कोहलीने जसप्रीत बुमराहचे तोंडभरून कौतुक केले.



कोहली म्हणाला 'बुमराह हा राष्ट्रीय खजिना आहे'


भारतीय फलंदाज विराट कोहलीने जसप्रीत बुमराहवर स्तुती सुमने उधळताना म्हटले की तो भारताचा राष्ट्रीय खजिना आहे. तसेच तो जगातील आठवे आश्चर्य आहे.


मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सन्मान सोहळ्यादरम्यान कोहलीशी बातचीत करताना तेथील उपस्थितांनी त्याला मजेशीर अंदाजात विचारले की बुमराहला राष्ट्रीय खजिना आणि जगातील आठवे आश्चर्य घोषित करणाऱ्या याचिकेवर स्वाक्षरी करशील का?


यावेळी थोडासाही विलंब न लावता विराट कोहलीने उत्तर दिले की मी आता या याचिकेवर स्वाक्षरी करण्यास तयार आहे. त्याला स्वत:ला ठरवायचे आहे की कशा पद्धतीचे वेळापत्रक बनवायचे आहे. आम्हाला फक्त इतके वाटते की त्याने जितके शक्य असेल तितके खेळावे. तो एखाद्या पिढीमध्ये येणारा एकमेव गोलंदाज आहे आणि आम्हाला गर्व आहे की तो आपल्यासाठी खेळतो.


विराट कोहलीने मान्य केले की जेव्हा शेवटच्या पाच षटकांत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी केवळ ३० धावा हव्या होत्या. तेव्हा त्यांना वाटले होते की भारताचा विजय कठीण आहे. मात्र बुमराहच्या खेळीने साऱ्यांनाच प्रभावित केले. त्याने केवळ ६ धावा देत एक विकेट घेत संघाला पुन्हा खेळात आणले.

Comments
Add Comment

अफगाणिस्तानचा कॅनडाविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय

चेन्नई : इब्राहिम झद्रानच्या वादळी फलंदाजीनंतर मोहम्मद नबीने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने

झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेचेही उडवली दाणादाण

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेचेही दाणादाण उडवली.

सलग तीन शून्यांनंतर गावस्कर यांचा अभिषेकला सल्ला

मुंबई : टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला

वेस्ट इंडिजची विजयी घोडदौड कायम, इटलीवर विजय

कोलकाता : आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या साखळी फेरीत वेस्ट इंडिजने आपला दबदबा कायम राखत इटलीचा ४२ धावांनी पराभव केला.

T20 World Cup 2026: जाणून घ्या भारताच्या सुपर ८ सामन्यांचे वेळापत्रक; कोणत्या संघासोबत कधी होणार मुकाबला

मुंबई: आयसीसीच्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे. सलग चार विजयांसह, भारताने सुपर ८ मध्ये

अहमदाबादमध्ये भारताचा विजयी चौकार

शिवमचा झंझावात आणि चक्रवर्तीची फिरकी नेदरलँड्सवर १७ धावांनी मात अहमदाबाद  : अहमदाबादच्या मैदानावर भारतीय