Virat Kohli: तो जगातील आठवे आश्चर्य, मी सही करायला तयार...बुमराहच्या कौतुकादरम्यान पहा काय म्हणाला कोहली

  110

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४मद्ये दक्षिण आफ्रिकेला हरवत टीम इंडिया मायदेशात परतली आहे. टीम इंडिया ४ जुलैला सकाळी ६ वाजून९ मिनिटांनी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली होती.


यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. येथे चॅम्पियन्स आणि टी-२० वर्ल्डकप ट्रॉफीची विजयी मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत लाखोंच्या संख्येने चाहते होते. यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये चॅम्पियन्ससाठी कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात विराट कोहलीने जसप्रीत बुमराहचे तोंडभरून कौतुक केले.



कोहली म्हणाला 'बुमराह हा राष्ट्रीय खजिना आहे'


भारतीय फलंदाज विराट कोहलीने जसप्रीत बुमराहवर स्तुती सुमने उधळताना म्हटले की तो भारताचा राष्ट्रीय खजिना आहे. तसेच तो जगातील आठवे आश्चर्य आहे.


मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सन्मान सोहळ्यादरम्यान कोहलीशी बातचीत करताना तेथील उपस्थितांनी त्याला मजेशीर अंदाजात विचारले की बुमराहला राष्ट्रीय खजिना आणि जगातील आठवे आश्चर्य घोषित करणाऱ्या याचिकेवर स्वाक्षरी करशील का?


यावेळी थोडासाही विलंब न लावता विराट कोहलीने उत्तर दिले की मी आता या याचिकेवर स्वाक्षरी करण्यास तयार आहे. त्याला स्वत:ला ठरवायचे आहे की कशा पद्धतीचे वेळापत्रक बनवायचे आहे. आम्हाला फक्त इतके वाटते की त्याने जितके शक्य असेल तितके खेळावे. तो एखाद्या पिढीमध्ये येणारा एकमेव गोलंदाज आहे आणि आम्हाला गर्व आहे की तो आपल्यासाठी खेळतो.


विराट कोहलीने मान्य केले की जेव्हा शेवटच्या पाच षटकांत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी केवळ ३० धावा हव्या होत्या. तेव्हा त्यांना वाटले होते की भारताचा विजय कठीण आहे. मात्र बुमराहच्या खेळीने साऱ्यांनाच प्रभावित केले. त्याने केवळ ६ धावा देत एक विकेट घेत संघाला पुन्हा खेळात आणले.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र