‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला संसर्ग झाल्यामुळे मुलाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाण्यातील अमिबा नाकातून त्याच्या शरीरात शिरला. मुलाच्या मेंदूमध्ये अमीबाचा संसर्ग पसरला.मेंदूच्या संसर्गामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. केरळ राज्याच्या आरोग्य विभागाने याची माहिती दिली आहे.


यापूर्वी २१ मे रोजी मलप्पुरममधील ५ वर्षांच्या मुलीचा आणि २५ जून रोजी कन्नूर येथील १३ वर्षांच्या मुलीचा या धोकादायक अमिबामुळे मृत्यू झाला होता.


याला बोली भाषेत ‘ब्रेन इटिंग अमिबा’ असेही म्हणतात. वैद्यकीय भाषेत याला पीएएम (Primary amoebic meningoencephalitis) असे म्हणतात. केरळमध्ये गेल्या दोन महिन्यांत अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीसमुळे झालेला हा तिसरा मृत्यू आहे.


यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, पीएएम हा अमिबा किंवा नेग्लेरिया फॉवलेरी नावाच्या एकल-पेशी जीवामुळे होणारा मेंदूचा संसर्ग आहे. हा अमीबा तलाव, नद्या आणि गरम पाण्याचे झरे यांसारख्या माती आणि उबदार गोड्या पाण्यात राहतो. याला सामान्यतः ‘ब्रेन इटिंग अमिबा’ असे म्हणतात कारण जेव्हा अमिबा असलेले पाणी नाकात जाते तेव्हा ते मेंदूला संक्रमित करते. ‘प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस’ म्हणजेच पीएएम या आजारात मेंदू खाणारा अमिबा मानवी मेंदूला संसर्ग करतो आणि मांस खातो.

Comments
Add Comment

Dadar-Ratnagiri passenger : दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल पुन्हा दादर स्थानकापर्यंत करा; खासदार रविंद्र वायकर यांची मागणी

- शक्य असल्यास ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करा - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी

मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा

CCTV Certification Rules: १ एप्रिलपासून अनेक चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मुंबई: भारतातील सीसीटीव्ही बाजारपेठेत मोठे बदल होणार आहेत. भारत इंटरनेट-कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचे

नितीश यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; कोण होणार मुख्यमंत्री?

नवी दिल्ली: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी ते राज्यसभेवर

Jobs Alert : १२ वी नंतर विमानतळावर करिअरची मोठी संधी; लाखोंचं पॅकेज आणि हाय-प्रोफाईल लाईफस्टाईल, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : सध्याच्या काळात विमान वाहतूक (Aviation) क्षेत्र हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक