‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला संसर्ग झाल्यामुळे मुलाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाण्यातील अमिबा नाकातून त्याच्या शरीरात शिरला. मुलाच्या मेंदूमध्ये अमीबाचा संसर्ग पसरला.मेंदूच्या संसर्गामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. केरळ राज्याच्या आरोग्य विभागाने याची माहिती दिली आहे.


यापूर्वी २१ मे रोजी मलप्पुरममधील ५ वर्षांच्या मुलीचा आणि २५ जून रोजी कन्नूर येथील १३ वर्षांच्या मुलीचा या धोकादायक अमिबामुळे मृत्यू झाला होता.


याला बोली भाषेत ‘ब्रेन इटिंग अमिबा’ असेही म्हणतात. वैद्यकीय भाषेत याला पीएएम (Primary amoebic meningoencephalitis) असे म्हणतात. केरळमध्ये गेल्या दोन महिन्यांत अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीसमुळे झालेला हा तिसरा मृत्यू आहे.


यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, पीएएम हा अमिबा किंवा नेग्लेरिया फॉवलेरी नावाच्या एकल-पेशी जीवामुळे होणारा मेंदूचा संसर्ग आहे. हा अमीबा तलाव, नद्या आणि गरम पाण्याचे झरे यांसारख्या माती आणि उबदार गोड्या पाण्यात राहतो. याला सामान्यतः ‘ब्रेन इटिंग अमिबा’ असे म्हणतात कारण जेव्हा अमिबा असलेले पाणी नाकात जाते तेव्हा ते मेंदूला संक्रमित करते. ‘प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस’ म्हणजेच पीएएम या आजारात मेंदू खाणारा अमिबा मानवी मेंदूला संसर्ग करतो आणि मांस खातो.

Comments
Add Comment

Tirupati laddu : तिरुपती लाडू भेसळ प्रकरण : सीबीआयकडून मोठा खुलासा; लाडूमध्ये 'बीफ टॅलो' किंवा प्राण्यांची चरबी नसल्याचे स्पष्ट

नेल्लोर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या तिरुपती लाडू भेसळ प्रकरणात सीबीआयने (CBI) आपला अंतिम आरोपपत्र (Chargesheet)

Union Budget 2026 : १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प! काय स्वस्त, काय महाग? बजेट मध्ये यंदा काय खास? सुट्टीच्या दिवशी इथे LIVE पहा अर्थसंकल्प

नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडणारा 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७' येत्या रविवारी, १

P. T. Usha: धावपटू पी.टी. उषा यांच्या पतीचे निधन; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा यांच्या पतीचे निधन झाले आहे. पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांनी वयाच्या ६७ व्या

आयुष मंत्रालयाचा झेप्टोसोबत सामंजस्य करार

आता १० मिनिटांत औषधं दारात! नवी दिल्ली : देशातील सर्वसामान्य नागरिकांना आयुष औषधं आणि वेलनेस औषधं सहज उपलब्ध

योजना केवळ कागदांवर न राहता थेट नागरिकांच्या जीवनात पोहोचाव्यात

अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी घेतला विकासाचा आढावा नवी दिल्ली : जरी सध्या देशाचे लक्ष अर्थसंकल्पाकडे

Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी