‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला संसर्ग झाल्यामुळे मुलाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाण्यातील अमिबा नाकातून त्याच्या शरीरात शिरला. मुलाच्या मेंदूमध्ये अमीबाचा संसर्ग पसरला.मेंदूच्या संसर्गामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. केरळ राज्याच्या आरोग्य विभागाने याची माहिती दिली आहे.


यापूर्वी २१ मे रोजी मलप्पुरममधील ५ वर्षांच्या मुलीचा आणि २५ जून रोजी कन्नूर येथील १३ वर्षांच्या मुलीचा या धोकादायक अमिबामुळे मृत्यू झाला होता.


याला बोली भाषेत ‘ब्रेन इटिंग अमिबा’ असेही म्हणतात. वैद्यकीय भाषेत याला पीएएम (Primary amoebic meningoencephalitis) असे म्हणतात. केरळमध्ये गेल्या दोन महिन्यांत अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीसमुळे झालेला हा तिसरा मृत्यू आहे.


यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, पीएएम हा अमिबा किंवा नेग्लेरिया फॉवलेरी नावाच्या एकल-पेशी जीवामुळे होणारा मेंदूचा संसर्ग आहे. हा अमीबा तलाव, नद्या आणि गरम पाण्याचे झरे यांसारख्या माती आणि उबदार गोड्या पाण्यात राहतो. याला सामान्यतः ‘ब्रेन इटिंग अमिबा’ असे म्हणतात कारण जेव्हा अमिबा असलेले पाणी नाकात जाते तेव्हा ते मेंदूला संक्रमित करते. ‘प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस’ म्हणजेच पीएएम या आजारात मेंदू खाणारा अमिबा मानवी मेंदूला संसर्ग करतो आणि मांस खातो.

Comments
Add Comment

भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक बदल; लष्करप्रमुखांनी दिली महत्वाची माहिती

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावर्ती तणावाबाबत गेले काही महिने सकारात्मक घडामोडी घडत असल्याचे लष्करप्रमुख जनरल

फाशीच्या शिक्षेवर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांची प्रतिक्रिया

ढाका - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना युनुस सरकारने स्थापने केलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हे

बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

वडाळ्यातील गेल पाईपलाईन बिघाडामुळे मुंबईत सीएनजी टंचाई मुंबई : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य

लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला अटक! कोण आहे आमिर रशीद अली?

दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश

केएफसी आणि मॅकडोनाल्डसारखे फूड ब्रॅण्ड रेल्वेस्थानकांवर उघडणार

रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात केला मोठा बदल नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात एक मोठा