Ranjeet Nimbalkar : राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये!

यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी


भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका


सोलापूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त सध्या महाराष्ट्रातील शेकडो दिंड्या विठुरायाच्या भेटीला निघाल्या आहेत. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची (Ashadhi Wari) मोठी गर्दी दिसून येत आहे. अशातच काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विठुरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी वारीत पायी सहभागी होणार असल्याची घोषणा केली. राहुल गांधींच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असताना साताऱ्यातील माजी खासदार रणजीत निंबाळकर (Ranjeet Nimbalkar) यांनी राहुल गांधींवर बोचरी टीका केली आहे.


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मात्र भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर यांनी राहुल गांधींच्या या गोष्टीला विरोध केला आहे. राहुल गांधी केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी वारीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्यात कॅट वॉक करायला येऊ नये, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांवर केली.



काय म्हणाले रणजीत निंबाळकर?


रणजीत निंबाळकर म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षाने या भोळ्या भाबड्या वारकरी संप्रदायाचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करू नये. आजवर राहुल गांधी यांना कधी विठ्ठल अथवा कोणत्याही देवाची पालखी आठवली नाही. मात्र सध्याच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा घेण्यासाठी पालखीत सहभागी होण्याचा चर्चा सुरू केल्या आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो. त्यासोबत पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकारने कोट्यावधींचा निधी वारकरी संप्रदायाला दिला आहे. मात्र यात कोणताही राजकीय वापर केला नसल्याचा दावा निंबाळकर यांनी केला आहे.

Comments
Add Comment

Buldhana News : हृदयद्रावक! लेकीचं कन्यादान करतानाच बापाने सोडले प्राण; बुलढाण्यात लग्नमंडपातच हळहळ

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील वरदडी गावात एका मंगलमय प्रसंगाचे रूपांतर क्षणातच एका

Pune News : पुण्यात खळबळ! 'त्या' ६ तासांचं गूढ काय? १०० सीसीटीव्ही तपासूनही पुण्यातील बॉम्ब प्रकरणाचा सूत्रधार मोकाटच!

पुणे : पुण्याच्या हडपसर भागातील एका नामांकित रुग्णालयात आयईडी (IED) स्फोटक सदृश्य वस्तू सापडल्याने संपूर्ण शहरात

Oath-Taking Ceremony Vidhanparishad : विधानपरिषदेच्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ आणि पोटनिवडणुकीत विजयी

State gov issues regulations for fuel saving :वरिष्ठ अधिकाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस बस-मेट्रोने प्रवास, इंधन बचतीसाठी राज्य सरकारकडून नियमावली

मुंबई : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने

HSRP : १ जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP ) बसविणे अनिवार्य..

वाहनधारकांनी वेळेत अपॉइंटमेंट घेऊन HSRP बसवून घ्यावी; नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड मुंबई : राज्यातील वाहन

Jalgaon : सुखी संसाराचे अवघे २० दिवस ! उष्माघाताने नवविवाहितेचा मृत्यू

Jalgaon : संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेक ठिकाणी उष्माघातामुळे अनेकांना जीव