Cycle Wari : पंढरीच्या वारीसाठी नाशिककरांची सायकलस्वारी!

एक दिव्यांगासह ३०० सायकल वारकऱ्यांचा सहभाग


नाशिक : विठू नामाचा गजर करत दरवर्षी हजारो वारकरी पंढरपूरला (Pandharpur) जातात. अशातच नाशिकमधून गेल्या बारा वर्षांपासून नाशिककर विठूरायाच्या दर्शनासाठी सायकलवारीने (Cycle Wari) पंढरपूरला जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही विठू माऊलीचा नामघोष करत सायकलिस्ट सायकलने नाशिक ते पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. विशेषत: यावेळी या सायकलवारीमध्ये एक दिव्यांग सहभागी झाला असून तो एका पायानेच सायकल चालवून वारीमध्ये सहभागी झाला आहे.


सायकल वारीचे आयोजन संस्थापक हरीश बैजल सर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर वारी घेण्यात येते. यंदाचे या सायकलवारीचे १२वे वर्ष असून ३०० सायकल वारकरी सहभागी झाले आहेत. त्यामध्ये एक दिव्यांग व्यक्तीसह ४० महिलांचाही समावेश आहे. आज सकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथून सहाच्या सुमारास या सायकल वारीची सुरुवात करण्यात आली. यावेळी वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव , एवरेस्ट वीर द्वारका डोखे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकचे सहसंचालक संजय बारकुंड, रॅम विजेते डॉ. महेंद्र महाजन हे उपस्थित होते.



ढोल ताशाच्या गजरात उत्साहवर्धक वातावरण


आज सकाळी ढोल ताशाच्या गजरात सर्व उपस्थित मान्यवरांनी सायकल वारकऱ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर प्रत्येकाच्या कपाळी विठ्ठलाचा टिळा लावण्यात आला. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा व वारीचा ध्वज घेऊन सायकलिस्ट च्या आगमनानंतर मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल आरती झाली. त्यानंतर श्रीफळ अर्पण करून ढोल ताशाच्या गजरात, माऊली, माऊली, गजर करत हिरवा झेंडा दाखवून सायकल वारीची सुरुवात झाली. रिमझिम पावसाची सुरुवात झाल्यामुळे उत्साहात अधिकच भर पडली.


सिन्नरचा घाट पार केल्यानंतर सिन्नर सायकलिस्ट ग्रुपच्या वतीने खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते सायकलपटूंचे स्वागत करण्यात आले. अमली पदार्थ मुक्त देश व्हावा यासाठी सामाजिक संदेश घेऊन ही वारी आयोजित केल्याबद्दल नाशिक सायकलिस्टचे विशेष कौतुक करण्यात आले. दिव्यांग सायकलिस्ट सुनील पवार यांचा विशेष सत्कार केला. आज ही सायकल स्वारी १६० किलोमीटर अंतर पार करणार असून त्यानंतर त्यांची अहिल्यानगर येथे मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य