नाशिक : विठू नामाचा गजर करत दरवर्षी हजारो वारकरी पंढरपूरला (Pandharpur) जातात. अशातच नाशिकमधून गेल्या बारा वर्षांपासून नाशिककर विठूरायाच्या दर्शनासाठी सायकलवारीने (Cycle Wari) पंढरपूरला जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही विठू माऊलीचा नामघोष करत सायकलिस्ट सायकलने नाशिक ते पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. विशेषत: यावेळी या सायकलवारीमध्ये एक दिव्यांग सहभागी झाला असून तो एका पायानेच सायकल चालवून वारीमध्ये सहभागी झाला आहे.
सायकल वारीचे आयोजन संस्थापक हरीश बैजल सर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर वारी घेण्यात येते. यंदाचे या सायकलवारीचे १२वे वर्ष असून ३०० सायकल वारकरी सहभागी झाले आहेत. त्यामध्ये एक दिव्यांग व्यक्तीसह ४० महिलांचाही समावेश आहे. आज सकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथून सहाच्या सुमारास या सायकल वारीची सुरुवात करण्यात आली. यावेळी वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव , एवरेस्ट वीर द्वारका डोखे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकचे सहसंचालक संजय बारकुंड, रॅम विजेते डॉ. महेंद्र महाजन हे उपस्थित होते.
आज सकाळी ढोल ताशाच्या गजरात सर्व उपस्थित मान्यवरांनी सायकल वारकऱ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर प्रत्येकाच्या कपाळी विठ्ठलाचा टिळा लावण्यात आला. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा व वारीचा ध्वज घेऊन सायकलिस्ट च्या आगमनानंतर मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल आरती झाली. त्यानंतर श्रीफळ अर्पण करून ढोल ताशाच्या गजरात, माऊली, माऊली, गजर करत हिरवा झेंडा दाखवून सायकल वारीची सुरुवात झाली. रिमझिम पावसाची सुरुवात झाल्यामुळे उत्साहात अधिकच भर पडली.
सिन्नरचा घाट पार केल्यानंतर सिन्नर सायकलिस्ट ग्रुपच्या वतीने खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते सायकलपटूंचे स्वागत करण्यात आले. अमली पदार्थ मुक्त देश व्हावा यासाठी सामाजिक संदेश घेऊन ही वारी आयोजित केल्याबद्दल नाशिक सायकलिस्टचे विशेष कौतुक करण्यात आले. दिव्यांग सायकलिस्ट सुनील पवार यांचा विशेष सत्कार केला. आज ही सायकल स्वारी १६० किलोमीटर अंतर पार करणार असून त्यानंतर त्यांची अहिल्यानगर येथे मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…