Virat Kohli : सेलिब्रेशननंतर विराट कोहली तडक निघाला लंडनला! काय आहे कारण?

मुंबई : भारताने तब्बल १७ वर्षांनंतर खेचून आणलेल्या टी-२० विश्वचषकामुळे (T20 World cup) देशभरात आनंदाची लाट उसळली आहे. काल मरीन ड्राईव्ह (Marine Drive) येथे विजयी भारतीय संघाला प्रत्यक्ष पाहण्यासाठी उसळलेला जनसागर पाहता याची प्रचिती आली. या शोभायात्रेनंतर वानखेडे स्टेडिअमवरही (Wankhede Stadium) अनेक चाहत्यांच्या उपस्थितीत जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. या सेलिब्रेशननंतर भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) तडक लंडनला रवाना झाला आहे. याचं मोठं कारणही समोर आलं आहे.


विराट कोहलीचा देशभरातच नव्हे तर अख्ख्या जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या कामासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चाहत्यांना प्रचंड रस आहे. पण विराट आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना त्यांचं वैयक्तिक आयुष्य कायम खाजगी ठेवायला आवडतं. त्यांच्या मुलांचे चेहरे देखील त्यांनी अद्याप मिडीयासमोर आणलेले नाहीत.


विराट कोहली नेहमीच आपल्या कामामधून जसा वेळ मिळेल तसं आपल्या कुटुंबाला वेळ देताना दिसतो. यावेळीही विजयी सेलिब्रेशननंतर तो तडक लंडनला निघाला याचं कारण म्हणजे विराटची पत्नी अनुष्का आणि त्याची दोन मुलं वामिका आणि अकाय लंडनमध्ये आहेत. याआधी विराटने दिल्लीमध्ये त्याची बहिण आणि भावासोबतही चांगला वेळ घालवला होता. यानंतर तो आता पत्नी व मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी लंडनला निघाला आहे.

Comments
Add Comment

Criminal Public Representatives : गुन्हेगार लोकप्रतिनिधींना सन्मानाची गरज नाही!

मुंबई : विधानमंडळ किंवा संसदेचे सदस्य (आमदार, खासदार) शासकीय कार्यालयात आल्यावर त्यांना उभे राहून अभिवादन

Pandharpur विठ्ठल मंदिर समितीच्या गोशाळेच्या विस्ताराचा मार्ग मोकळा

मुंबई : पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळा विस्तारासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित

Summer Vacation : शाळा सुटली, उन्हाळी सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यातील उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढलेल्या तापमानात विद्यार्थी शाळेत येण्याच्या निमित्ताने

Banks Closed : मे महिन्यात 13 दिवस बँका राहणार बंद

मुंबई : मे 2026 महिन्यात देशभरातील बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून, विविध सण, राष्ट्रीय आणि

Mira-Bhayandar terror scare : आरोपी जुबैर ‘जिहाद’च्या नावाखाली हिंदूंवर हल्ला करू इच्छित होता- मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले की, मीरा रोड येथे झालेला संशयित ‘लोन वुल्फ’

Mantralaya : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्पष्टीकरण मुंबई : मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या