PM Narendra Modi : लोकसभेनंतर पंतप्रधान मोदी यांचा पहिला मुंबई दौरा!

'या' खास कारणासाठी येणार मुंबईत


मुंबई : सध्या देशभरात आगामी विधानसभा निवडणुकीचे (Assembly Elections) वारे पसरले आहेत. राज्यातील सर्व राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना महायुतीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लवकरच मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभेच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींचा पहिलाच दौरा असणार आहे. त्यामुळे दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १३ जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत हजारो कोटींच्या प्रस्तावित प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी ६,३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रस्तावित १,१७० कोटी रुपयांच्या ऑरेंज गेट ते ग्रँट रोड उन्नत मार्गाच्या प्रकल्पाचेही भूमिपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया सुविधांचाही समावेश असणार आहे.

Comments
Add Comment

लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ

मुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; कोणत्या शहरांमध्ये गारठा वाढणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज!

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात थंडीचा जोर वाढत असल्याचे हवामान विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अनेक

विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक; मंगल नांगरे पाटील यांचे निधन

मुंबई : महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांना मातृशोक झाला आहे. त्यांच्या मातोश्री

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल ५-१२ वर्षे वयादरम्यान तिकिटाचे धोरण ठरणार

मुंबई : भारतीय रेल्वेच्या २०२५ च्या बाल तिकीट धोरणानुसार ५ वर्षांखालील मुले स्वतंत्र बर्थ किंवा सीट न घेता

उबाठा युवा सेनेतील ३०० कार्यकर्ते शिंदे गटात

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलताना

ला निनाच्या प्रभावामुळे यंदा मुंबईकर गारठणार

मुंबई : नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.