Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

  68

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम इंडियाचे मुंबईत जंगी स्वागत झाले. मरीन ड्राईव्हवर तर चाहत्यांनी लाखोंच्या संख्येने विश्वविजेत्या संघाला पाहण्यासाठी गर्दी केली होती.


चारही बाजूंनी टीम इंडियाचे कौतुक केले जात आहे. त्यातच आता महाराष्ट्र सरकारकडून चार मुंबईकर खेळाडूंना बक्षीस जाहीर केले आहे. टीम इंडियाच्या विजयी संघाचा भाग असलेल्या खेळाडूंना सरकारकडून प्रत्येकी एक कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.


रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जायसवाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार केला जाणार आहे. तसेच या खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या सर्व खेळाडूंचा शुक्रवारी संध्याकाळी विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये सत्कार केला जाईल.


रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने २९ जूनला फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवत टी-२० वर्ल्डकप खिताबावर आपले नाव कोरले होते. भारतीय संघाने चुरशीच्या सामन्यात अखेर बाजी मारत ही ट्रॉफी जिंकली.
Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी