Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम इंडियाचे मुंबईत जंगी स्वागत झाले. मरीन ड्राईव्हवर तर चाहत्यांनी लाखोंच्या संख्येने विश्वविजेत्या संघाला पाहण्यासाठी गर्दी केली होती.


चारही बाजूंनी टीम इंडियाचे कौतुक केले जात आहे. त्यातच आता महाराष्ट्र सरकारकडून चार मुंबईकर खेळाडूंना बक्षीस जाहीर केले आहे. टीम इंडियाच्या विजयी संघाचा भाग असलेल्या खेळाडूंना सरकारकडून प्रत्येकी एक कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.


रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जायसवाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार केला जाणार आहे. तसेच या खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या सर्व खेळाडूंचा शुक्रवारी संध्याकाळी विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये सत्कार केला जाईल.


रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने २९ जूनला फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवत टी-२० वर्ल्डकप खिताबावर आपले नाव कोरले होते. भारतीय संघाने चुरशीच्या सामन्यात अखेर बाजी मारत ही ट्रॉफी जिंकली.
Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण