Hathras stampede : हाथरस दुर्घटनेनंतर भोलेबाबा फरार! अखेर दुसऱ्या दिवशी दिली प्रतिक्रिया...

भोलेबाबा बनण्याआधी होता उत्तर प्रदेश पोलिसांत कॉन्स्टेबल


१२१ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?


लखनऊ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये भोलेबाबांच्या सत्संगात चेंगराचेंगरी (Hathras Stampede) होऊन भीषण दुर्घटना घडली. यामध्ये १२१ जणांचा मृत्यू झाला, तर १०० जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर ज्यांच्या सत्संगासाठी लोक जमले होते असे नारायण साकार हरि उर्फ भोलेबाबा (Bholebaba) मात्र फरार झाले होते. त्यांचा फोनही बंद होता. अखेर त्यांची या दुर्घटनेवर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.


या दुर्घटनेवर भोले बाबा म्हणाले की, हाथरसमध्ये चेंगराचेंगरीमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या आधीच ते तिथून निघून गेले होते. त्यांनी म्हटले की काही समाजकंटकांनी सत्संगाच्या ठिकाणी गोंधळ माजवला. याशिवाय त्यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांबद्दल शोक भावना व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी हेही सांगितले की याप्रकरणी त्यांनी वकील एपी सिंह यांची नियुक्ती केली आहे.


भोले बाबांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, आमच्यावतीने याप्रकरणी ए.पी. सिंह वरिष्ठ अधिवक्ता, सर्वोच्च न्यायालय यांना अधिकृत केले जात आहे. जेणेकरून समागम/सत्संगानंतर काही असामाजिक तत्वांनी चेंगराचेंगरी निर्माण केल्याच्या संदर्भात योग्य ती कारवाई करता येईल.



भोलेबाबा बनण्याआधी होता उत्तर प्रदेश पोलिसांत कॉन्स्टेबल


नारायण साकार विश्व हरि हा भोले बाबा बनण्यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांत कॉन्स्टेबल सूरज पाल सिंह या नावाने ओळखला जात होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय सूरज पाल सिंह हा कासगंज जिल्ह्यातील बहादुर नगर गावातील एका दलित कुटुंबातील आहे. या घटनेनंतर आता त्याची खरी ओळख समोर आली आहे. एक दशकापर्यंत पोलिस दलात नोकरी केल्यानंतर भोले बाबाने नोकरी सोडली. त्याची अखेरची पोस्टिंग ही आग्रा येथे होती.


भोले बाबा याचं लग्न झालेलं असून त्यांना मुलं नहीत. सूरज पाल सिंहने पोलिसची नोकरी सोडल्यानंतर आपलं नाव भोले बाबा ठेवलं. त्याच्या पत्नीला माताश्री म्हणून ओळखलं जातं. भोले बाबाने पाच वर्षांपूर्वी गाव सोडलं.



योगी आदित्यनाथ यांनी दिले घटनेच्या चौकशीचे आदेश


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हाथरस येथील दुर्घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या नेतृत्वात एक समिती गठीत केली जात आहे. अलिगडचे पोलीस कमिश्नर यांना दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना आहे की षडयंत्र हे जाणून घेण्यासाठी सरकार याच्या मुळापर्यंत जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

West Bengal Election : मतमोजणीसाठी ४३२ निरीक्षक तैनात, उत्तर २४ परगणा येथे सर्वाधिक देखरेख

कोलकाता  : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांची वेळ आता जवळ आली आहे. सोमवारी राज्यातील २९३ जागांवर

Air Force Rescue: शिडी तुटली आणि सुरू झाला १६ तासांचा थरार! रील बनवणाऱ्या मुलांना एअरफोर्सने कसं वाचवलं? अंगावर काटा आणणारी घटना

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथे घडलेली ही धक्कादायक आणि थरारक घटना सध्या सर्वत्र चर्चेत आहे.

Delhi Judge : दिल्लीत न्यायाधीशाची आत्महत्या, कारण आलं समोर

नवी दिल्ली : सर्वांना न्याय देणारे न्यायायाधीशच मनाने खचले आणिआत्महत्या केली. दिल्लीतील या घटनेमुळे संपूर्ण देश

Delhi AC Blast: दिल्लीतील विवेक विहारमध्ये एसीचा स्फोट; स्फोटामुळे भीषण आग; ९ जणांचा मृत्यू,अनेक जखमी

नवी दिल्ली: दिल्लीतील विवेक विहार परिसरातील चार मजली इमारतीत पहाटे एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत ९

India-Cambodia Bilateral Military : भारत-कंबोडिया द्विपक्षीय लष्करी सराव ‘सिनबॅक्स- II 2026’ साठी भारतीय लष्कराची तुकडी रवाना

नवी दिल्ली : भारत-कंबोडिया द्विपक्षीय लष्करी सरावाची दुसरी आवृत्ती ‘सिनबॅक्स-II 2026’ साठी भारतीय लष्कराची एक तुकडी

Madhya Pradesh : म. प्रदेशातील बर्गी क्रूझ शिप दुर्घटनेतील मृतांचा आकडा १२ वर

भोपाळ : मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात नर्मदा नदी वर बांधलेल्या बर्गी धरणात झालेल्या क्रूझ दुर्घटनेनंतर मदत व