Weather Update : महाराष्ट्रासह 'या' राज्यांना पुढील तीन दिवस महत्त्वाचे!

हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा


मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. राज्यातील ठिकठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईत पावसाची ये-जा व उष्णतेची लाट असे बदलते वातावरण सुरु असले तरीही राज्यात अनेक भागात पाऊसपाणी होत असल्याचे चित्र दिसून येते. राज्यभरात पाऊस धुमाकूळ घालत असताना हवामान विभागाने (IMD) पाऊस संदर्भात महत्त्वाची अपडेट (Weather Update) जारी केली आहे. हवामान विभागाकडून महाराष्ट्रासह काही राज्यांना पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा (Heavy Rain Alert) इशारा देण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, यंदा राज्यात मान्सून वेळेआधीच दाखल झाल्यामुळे यावेळी मान्सूनची वाटचाल वेगाने सुरु असल्याचे दिसून येत आहे. अशातच हवामान विभागाने पुढील तीन दिवस काही जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. विभागाने काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून रेड अलर्ट जारी केला आहे. त्यासोबत येत्या २४ तासांतही अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.



'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा


हवामान विभागाने २४ तासांत विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यासोबत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा दिला आहे. तर कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.



देशातील 'या' भागात अतिवृष्टीचा इशारा


हवामान विभागाने अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीवरील भागात अतिवृष्टीचा अंदाज दिला असून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी आहे. त्याचबरोबर काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय ५ आणि ६ जुलै रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह रेड अलर्ट जारी केला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून