Milk Price Hike : ग्राहकांच्या खिशाला चाप! गोकुळच्या दूध दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ

मुंबई : सध्या सातत्याने महागाई वाढत चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या अमूल (Amul company) आणि पराग कंपनीने (Parag company) दुधाचे दर वाढवले होते. त्यानंतर आता गोकुळ (Gokul) कंपनीने देखील दुधाच्या दरात वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांची चिंता आणखी वाढली आहे.


एका बाजूला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या (Milk Farmers) दुधाला कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला विविध दूध संस्था आपल्या दुधाच्या दरात वाढ करत आहेत. अमूल (Amul), मदर डेअरी (Mother dairy), परागनंतर आता गोकुळनेही गायीच्या दूध दरात (Gokul Milk Price hike) वाढ केली आहे. गोकुळने दुधाच्या दरात प्रतिलीटर २ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दुधाची किंमत आता प्रतिलीटर ५४ रुपयांवरुन ५६ रुपयांवर गेली आहे. मुंबईत गोकुळ दुधाची तब्बल ३ लाख लिटर विक्री होते. तर पुण्यात भागात ४० हजार लिटर दूधाची विक्री होते. त्यामुळे आता दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.



शेतकऱ्यांना दिलासा


सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही दिवसांपासून दूधाला ४० रुपये भाव मिळावा यासाठी राज्यातील शेतकरी आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता सरकारने ३५ रुपयांना भाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ३० रुपये स्थायी भाव तर ५ रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहे. १ जुलैपासून हे नवे दर लागू झाल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.


दरम्यान, खुले दूधाचे बाजारभाव सध्या ९० रुपये प्रति लिटर आहे. तर गोकुळ दूध १ लिटर ७२ रुपयांना मिळत आहे. मदर डेअरीचे एक लिटर दूध ७६ रुपये तर अमूल दूध ६८ रुपयांना विकले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दूधाचे दर ४० रुपये व्हावे, यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलन केलं होते. त्याच पार्श्वभूमीवर दूधाचे दर ३५ रुपये करण्यात आले आहेत. सर्वसामान्यांना लागणाऱ्या गोष्टींचेही भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे.

Comments
Add Comment

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन

Jalgaon : जळगाव-गोवा विमानसेवा फुल्ल; १५ जुलैपर्यंत ८०% तिकिटे हाऊसफुल

Jalgaon : पावसाळा सुरू होताच पर्यटनप्रेमींचा मोर्चा गोव्याकडे वळला असून, जळगावहून गोव्यासाठी सुरू असलेल्या

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका