Indian Team: टीम इंडियाच्या परतण्याला पुन्हा उशीर, चक्रवाती वादळामुळे सातत्याने येतायत अडचणी

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) आपल्या नावे केला. फायनल सामना २९ जून शनिवारी खेळवण्यात आला होता. यानंतर येथे चक्रवाती वादळामुळे संपूर्ण खेळ बिघडून गेला. त्यामुळे टीम इंडियाला बार्बाडोसमध्येच थांबावे लागले.


वादळामुळे बार्बाडोसचे विमानतळ बंद झाले आणि तेथे कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली. टीम इंडियाला मंगळवारी तेथून निघायचे होते मात्र याला उशीर झाला आहे.


मिडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआयने टीम इंडियासाठी स्पेशल फ्लाईटची व्यवस्था केली होती. यासाठी त्यांना मंगळवारी निघायचे होते. त्यानंतर बुधवारी संध्याकाळपर्यंत दिल्लीला पोहोचायचे होते. दरम्यान, याला आता उशीर होत आहे.



जिंकला टी-२० वर्ल्डकप खिताब


भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तब्बल १७ वर्षांनी टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली. याआधी २००७मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिला वहिला टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्यासाठी १७ वर्षे वाट पाहावी लागली.

Comments
Add Comment

Virat-Rohit Record : रोहित आणि विराटने रचला इतिहास ! अशी कामगिरी करणारी भारताची पहिली जोडी

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना सध्या लंडनच्या

Ind vs Eng : भारताच्या प्लेइंग-११ मध्ये मोठे बदल! जसप्रीत बुमराह संघातून बाहेर; नेमकं कारण काय ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना शनिवार १९ जुलै रोजी लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर

FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्ड कपच्या फायनलचा आनंद लुटता यावा म्हणून केरळ सरकारने घेतला थेट 'हा' निर्णय 

केरळ : फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात होणार आहे. या स्पर्धेचा परिणाम केरळवरही

FIFA World Cup 2026 : अंतिम सामन्यात अर्जेंटिना-स्पेन आमने सामने; ९६ वर्षांनंतर स्पॅनिश भाषिक देशांमध्ये ऐतिहासिक फायनल सामना

न्यू जर्सी : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात लढत होणार आहे. हा सामना केवळ

PV Sindhu : जपान ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधूने अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला हरवून रचला इतिहास

मुंबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपान ओपन सुपर 750 स्पर्धेत शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले

Ind vs Eng : भारत - इंग्लंड तिसरी ODI किती वाजता सुरू होणार ? कशी असेल लॉर्ड्सची खेळपट्टी ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना शनिवार १९ जुलै रोजी लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर