ICC T20 Rankings: भारतीय गोलंदाज ठरले अव्वल, वर्ल्डकप विजयानंतर रँकिंगमध्येही जलवा

  40

मुंबई: आयसीसीने बुधवारी ताजी टी-२० रँकिंग जाहीर केली. यात भारतीय गोलंदाजांनी मोठी उडी घेतली आहे. टी-२० रँकिंगमध्ये अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह अनेक खेळाडूंना फायदा झाला आहे.


टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या अव्वल स्थानावर पोहोचला आहे. तो ऑलराऊंडर्सच्या रँकिंगमध्ये अव्वल पोहोचणारा पहिला भारतीय बनला आहे. बुमराह, अक्षर आणि पांड्यासह अनेक भारतीय खेळाडूंनी २०२४च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केली होती. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवले होते.


बुमराह टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होता. बुमराहने ८ सामन्यात १५ विकेट मिळवल्या होत्या. त्याने टी-२० गोलंदाजी रँकिंगमध्ये १२ स्थानांनी उडी घेतली आहे. बुमराह १२व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी आणि वेस्ट इंडिजचा अल्जारी जोसेफसह अनेक गोलंदाजांना मागे टाकले आहे.


अर्शदीप टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या नंबरवर होता. अर्शदीपने ८ सामन्यांत १७ विकेट घेतल्या होत्या. अर्शदीपला रँकिंगमध्ये ४ स्थानांनी फायदा झाला आहे. तो १३व्या स्थानावर पोहोचला आहे. टी-२० गोलंदाजाच्या रँकिंगमध्ये भारताकडून अक्षर पटेल सगळ्यात वरच्या स्थानावर आहे. अक्षर ओव्हरऑल यादीत ७व्या स्थानावर आहे. त्याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. अक्षरने टीम इंडियासाठी शानदार कामगिरी केली होती.


जर फलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास रोहित शर्माला दोन स्थानांनी फायदा झाला आहे. तो ३६व्या स्थानावर आला आहे. विराट कोहलीला सात स्थानांनी फायदा झाला आहे. कोहली ४०व्या स्थानावर पोहोचला आहे.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला