Ashadi Wari : आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोलमाफी

मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७ जुलै रोजी आषाढी एकादशी असून पंढरपूरच्या दिंडीत भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. पंढरपुरमध्ये दाखल होण्यासाठी पालख्या पुढे सरकत असताना राज्य सरकार (State Government) देखील वारकऱ्यांच्या हिताचा विचार करत असल्याचे दिसत आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, आरोग्य केंद्रासह पालखी परिसरात स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे. अशातच आता राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची माहिती मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ (Toll Free) करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केला. तसेच या संदर्भातील जीआर सुद्धा राज्य सरकारने काढला आहे. यामध्ये पंढरपूरकडे जाणाऱ्या राज्यभरातील सर्व वारकऱ्यांच्या वाहनांना आजपासून २१ जुलैपर्यंत टोलमाफी जाहीर केली आहे.


दरम्यान,वारीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांना परिवहन विभागातून आवश्यक स्टिकर्स दिले जाणार आहेत. त्यासोबत गरज भासल्यास सुरक्षित व सुरळीत वाहतूकीसाठी वारीतील वाहने सोडून अवजड वाहनांना वारी मार्गावर बंदी घालण्याच्याही सूचनाही देण्यात आल्या आहेत.



महामंडळाच्या बसलाही टोलमाफी


महाराष्ट्र राज्यातून पंढरपूरकडे येणारे सर्व नाक्यांवर उपरोक्त कालावधीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसलाही सूट देण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत.

Comments
Add Comment

Reel Star Rohini Death : वैवाहिक मतभेद की व्यवसायातील ताण? रिल्सस्टार रोहिणी पाराध्येंनी का संपवलं आयुष्य? पोलिसांकडून तपास सुरु

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात

Nanded : नांदेडमधून एक मोठी बातमी समोरआली आहे. नांदेडमध्ये खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या ताफ्यातील चार

PM Awas Yojana-G : घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदवार्ता! सरकारकडून निधी मंजूर; रखडलेली कामे पुन्हा होणार वेगात

मुंबई : ग्रामीण भागातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री

Nashik : रिंगरोड भूसंपादनाच वाद चिघळला, प्रांतधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी पोलिसांनी उधळला

Nashik : नाशिक भोवतालच्या प्रस्तावित बाह्य रिंग रोड भूसंपादनाचा वाद चिघळताना दिसत आहे. भूसंपादन प्रक्रियेविरोधात

Solapur Crime : सोलापूर हादरलं ! दोन वर्षांच्या चिमुकल्यासह आईनं उचललं टोकाचं पाऊल; ७ जणांविरोधात गुन्हा दाखल

अक्कलकोटमधील धक्कादायक घटना; विहिरीत उडी घेत आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू... Crime News : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट

Nagpur Heatwave : नागपुरात उष्णतेची तीव्र लाट, गेल्या २४ तासांत उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू ?

नागपूर : नागपूरमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. गेल्या २४ तासांत उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय