Pankaja Munde : मला आज जे काही मिळतंय ते पाच जीवांच्या चरणी अर्पण करते!

अर्ज भरण्याआधी पंकजा मुंडे सिद्धीविनायकाच्या चरणी भावूक


मुंबई : लोकसभेत (Loksabha) पराभव पत्करावा लागलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपने विधानपरिषदेत (Vidhanparishad) संधी दिली आहे. काल भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे यांचं नाव पाहून त्यांचे कार्यकर्तेही आनंदी झाले. आज विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे (Siddhivinayak) दर्शन घेतले. त्याच्या चरणी भावूक होत आपलं हे यश माझ्यासाठी बलिदान दिलेल्या जीवांच्या चरणी अर्पण करते, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.


बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. बीडमधील पाच तरुण कार्यकर्त्यांनी यामुळे आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन पंकजा मुंडे भावूक झाल्या होत्या व कार्यकर्त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आज जे काही मिळतंय ते पाच जीवांच्या चरणी अर्पण करते, असं त्या म्हणाल्या.


पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'मी आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करत आहे. चांगल्या वाईट काळात ज्यांनी मला संधी दिली त्या जेपी नड्डा, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे, या सगळ्यांचे मी आभार मानते. मला प्रतिक्षा करावी लागली, आज लोकांना हवं ते झालं आहे. मला आज जे काही मिळतंय ते पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. आज ते इकडे असते तर घोषणा दिल्या असत्या. त्यांना मी हे यश समर्पित करते, असं म्हणत त्या भावूक झाल्या.



भाजपकडून विधानपरिषदेसाठी कुणाला संधी?


भाजपकडून विधानपरिषदेसाठी काल पाच जणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे व सदाभाऊ खोत यांच्या नावांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

मुंबईत मूर्तिकारांना निशुल्क मंडप परवानगी, तात्पुरती विनामुल्य जागा

मुंबई: पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच मुंबई महानगरात पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्याकरीता

गारगाईच्या कंत्राटदाराला आणले गुडघ्यावर; महापालिकेच्या स्थायी समितीत उबाठाला जमले नाही ते महायुतीने करून दाखवले

मुंबई: गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाबाबत स्थायी समिती सदस्यांनी विविध प्रश्न

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा