Pankaja Munde : मला आज जे काही मिळतंय ते पाच जीवांच्या चरणी अर्पण करते!

  108

अर्ज भरण्याआधी पंकजा मुंडे सिद्धीविनायकाच्या चरणी भावूक


मुंबई : लोकसभेत (Loksabha) पराभव पत्करावा लागलेल्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपने विधानपरिषदेत (Vidhanparishad) संधी दिली आहे. काल भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे यांचं नाव पाहून त्यांचे कार्यकर्तेही आनंदी झाले. आज विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे (Siddhivinayak) दर्शन घेतले. त्याच्या चरणी भावूक होत आपलं हे यश माझ्यासाठी बलिदान दिलेल्या जीवांच्या चरणी अर्पण करते, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.


बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. बीडमधील पाच तरुण कार्यकर्त्यांनी यामुळे आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन पंकजा मुंडे भावूक झाल्या होत्या व कार्यकर्त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आज जे काही मिळतंय ते पाच जीवांच्या चरणी अर्पण करते, असं त्या म्हणाल्या.


पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'मी आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करत आहे. चांगल्या वाईट काळात ज्यांनी मला संधी दिली त्या जेपी नड्डा, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे, या सगळ्यांचे मी आभार मानते. मला प्रतिक्षा करावी लागली, आज लोकांना हवं ते झालं आहे. मला आज जे काही मिळतंय ते पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. आज ते इकडे असते तर घोषणा दिल्या असत्या. त्यांना मी हे यश समर्पित करते, असं म्हणत त्या भावूक झाल्या.



भाजपकडून विधानपरिषदेसाठी कुणाला संधी?


भाजपकडून विधानपरिषदेसाठी काल पाच जणांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे व सदाभाऊ खोत यांच्या नावांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

"जरांगे शब्द जपून वापरा, आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोणी…" निलेश राणेंचा थेट इशारा

जरांगे विरुद्ध वादात निलेश राणे यांचा नितेश राणेंना थेट पाठिंबा  मुंबई: मनोज जरांगे हे आझाद मैदानात मराठा

'मुंबईला वेठीस धरू नका, आझाद मैदानव्यतिरिक्त रस्ते मोकळे करा'

मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांनी

पुण्यातील येरवडा बालग्राम जमीन भाडेपट्ट्याला मुदतवाढ

मुंबई : येरवडा येथील बालग्राम (एस.ओ.एस. चिल्ड्रन्स व्हिलेज) संस्थेला पुणे शहरात मिळालेल्या जमिनीच्या

Manoj Jarange: न्यायालयाच्या आदेशानंतर मनोज जरांगेनीही दिला आंदोलकांना दम, हुल्लडबाजी करणाऱ्यांना म्हणाले...

काही तासांत रोडवरील गाड्या मैदानात लावा, मैदानातच झोपा, त्रास होईल असं वागू नका, जरांगे यांचे आंदोलकांना

Chhagan Bhujbal: मराठा आणि कुणबी एक हा मूर्खपणा; आमच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको

ओबीसी नेत्यांसोबतच्या बैठकीत काय निर्णय झाला, छगन भुजबळांनी दिली प्रतिक्रिया मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून १०

Devendra Fadanvis : "आता कोर्टाच्या आदेशांचं प्रशासन पालन करेल" – CM फडणवीसांचा ठाम इशारा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर आज मुंबई