Bombay High Court : भरघोस पगारासह मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची सुवर्णसंधी!

  271

जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता


मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी नोकरीची सुवर्णसंधी (Government Job) चालून आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court Recruitment) रिक्त पदे भरण्यासाठी राज्य सरकारद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत मानधनाच्या नियमांनुसार ही भरती जारी केली असून या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी असल्यामुळे इच्छुक तरुणांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा असे सांगण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयात पात्र तरुणांना महाव्यवस्थापक पदासाठी नोकरीची संधी मिळत आहे. या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून उमेदवारांना आपले अर्ज https://bombayhighcourt.nic.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत. उमेदवारांसाठी ९ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.



वय व शैक्षणिक पात्रता


या नोकरीसाठी २५ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही संधी आहे. या नोकरीसाठी एमबीए किंवा डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे. त्यांना ५ वर्षांचा अनुभव आणि प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन, आयटी व्यवस्थापन,एचआर याचे शिक्षण झालेले असावे. सरकारी संस्था किंवा प्रतिष्ठित कंपनीत कामाचा किमान ८ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.


अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. ज्या उमेदवाराकडे कायद्याची पदवी आहे त्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल. यासाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत पात्र ठरल्यानंतर १०० गुणांच्या परीक्षेसाठी बोलवण्यात येईल. पात्र उमेदवारांना ५७ हजार ५०० रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.