श्रीलंका दौऱ्यापासून भारताचा नवा प्रशिक्षक रुजू

जय शहा यांची माहिती


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण? या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोमवारी सांगितले. वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.


वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, निवडक माध्यमांशी बोलताना जय शहा म्हणाले की, प्रशिक्षक आणि निवडकर्ते दोघेही लवकरच नियुक्त केले जातील. सीएसीने मुलाखती घेतल्या आहेत आणि दोन नावे निश्चित केली आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे, आम्ही त्यानुसार जाऊ. व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. परंतु नवीन प्रशिक्षक श्रीलंका मालिकेपासून मिळणार आहे, असे जय शहा म्हणाले. भारतीय संघाला २७ जुलैपासून तीन टी-२० आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांसाठी श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे.


बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोमवारी सांगितले की, या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेत सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला नवीन मुख्य प्रशिक्षक मिळेल. मात्र राहुल द्रविडची जागा नक्की कोण घेणार? हे स्पष्ट केले नाही. द्रविडच्या जागी माजी सलामीवीर गौतम गंभीर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त होण्याची शक्यता आहे. क्रिकेट सल्लागार समितीने या कोचपदासाठी मुलाखती देखील घेतल्या आहेत. मात्र नव्या प्रशिक्षकाचे नाव जाहीर केलेले नाही.


बीसीसीआयने नोव्हेंबर २०२१ मध्ये राहुल द्रविड यांची भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपला होता. मात्र टी-२० विश्वचषक २०२४ पर्यंत द्रविड यांना मुदतवाढ देण्यात आली होती. दरम्यान नुकत्याच संपलेल्या टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेनंतर द्रविड यांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्याजागी नव्या मुख्य प्रशिक्षकाची लवकरच नियुक्ती केली जाणार आहे.


दरम्यान जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथे दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका २७ जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यापासून भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळणार आहे. दरम्यान या स्पर्धेत गौतम गंभीर यांचे नाव पुढे आहे. गंभीरने सलामीवीर म्हणून भारतासाठी शानदार कामगिरी केली आहे.

Comments
Add Comment

भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील

महिला एकदिवसीय क्रमवारीत लॉरा वुल्फार्ट अव्वल

स्मृती मानधना दुसऱ्या स्थानावर घसरली; जेमिमाची 'टॉप १०' मध्ये दमदार एन्ट्री मुंबई : नुकताच महिला वनडे वर्ल्ड कप

वर्ल्डकप जिंकल्यावर हरमनप्रीतने सोशल मीडियातून दिला 'हा' संदेश

नवी मुंबई : भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला आणि भारतीय क्रिकेटचा नवा अध्याय लिहिला.

जगज्जेत्या टीमचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना आवडतो 'हा' पदार्थ

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ वर भारतानं नाव कोरलं. ही किमया साधण्यासाठी टीम इंडियाला प्रेरित करणे आणि

कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीनंतर हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा

ICC Worldcup 2025 : भारताच्या लेकींनी विश्वचषक जिंकून इतिहास घडवला! वर्ल्ड कप जिंकून देशवासियांना दिला 'हा' सर्वात मोठा संदेश

नवी मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या (DY Patil Sports Academy) रोषणाईत, २ नोव्हेंबर (रविवार) रोजी भारतीय