आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे नवीन वेळापत्रक?

भारतात खेळण्यास नकार देऊन बांगलादेशचा बीसीसीआयला दणका


नवी दिल्ली : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ बांगलादेशमुळे नव्याने घडामोडी होणार आहेत. याआधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पुरुषांचा टी-२० वर्ल्ड कप २०२६ हा ७ फेब्रुवारीपासून सुरू होऊन ८ मार्च रोजी अंतिम सामना होईल. भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली हा बहुचर्चित स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.


बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे महत्त्वाची मागणी केली असून, भारतातील आपले सर्व सामने श्रीलंकेत हलवावेत, अशी विनंती केली आहे. या मागणीवर आयसीसीने गांभीर्याने दखल घेतली असून, चेअरमन जय शहा यांच्या नेतृत्वाखाली नव्या वेळापत्रकावर काम सुरू करण्यात आल्याचे समजते. ही मागणी अशा वेळी पुढे आली आहे, जेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सध्याची परिस्थिती लक्षात घेता कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुस्तफिजूर रहमानला रिलीज करण्यास सांगितले होते. भारताकडून बांगलादेशचा बंगालमध्ये आक्षेप असल्याने त्यांना मुंबईतच सर्व सामने खेळण्यास भाग पाडले जाण्याची शक्यता आहे.


भारताबाहेर सामने घेण्याची मागणी


बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय कोणताही वाद वाढवण्यासाठी नसून, केवळ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतला आहे. त्यामुळे आयसीसीने परिस्थितीची गंभीरता ओळखून बांगलादेशचे सर्व सामने भारताबाहेर, सुरक्षित ठिकाणी आयोजित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. श्रीलंका हा स्पर्धेचा सह-यजमान असला तरी, सध्याच्या वेळापत्रकानुसार बांगलादेशचे सर्व ग्रुप स्टेज सामने भारतातच होणार आहेत. यामध्ये चारपैकी तीन सामने कोलकात्यात, तर एक सामना मुंबईत खेळवण्यात येणार आहे.


बीसीसीआयसह आयसीसीसमोर पेच


बीसीसीआयने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सूत्रांच्या मते, विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेचे वेळापत्रक अवघ्या महिनाभर आधी बदलणे अत्यंत कठीण आहे. अचानक सर्व बुकिंग बदलणे, नवीन मिळविणे आणि त्याप्रमाणे शेड्यूल करणे कठीण आहे. यापूर्वी पाकिस्तानचे सामने हायब्रीड मॉडेलनुसार श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. आता बांगलादेशनेही त्याच धर्तीवर मागणी केली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, यामुळे भविष्यातील क्रिकेट स्पर्धांमध्ये चुकीचा पायंडा पडू शकतो.


खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी


रविवारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत भारतात होणाऱ्या सामन्यांदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्याची परिस्थिती आणि बांगलादेश सरकारकडून मिळालेल्या सल्ल्याचा विचार करता, सध्या भारतात दौरा करणे संघासाठी सुरक्षित नाही, असा निष्कर्ष बोर्डाने काढला. आधी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, बांगलादेशला कोलकात्यात तीन तर मुंबईत एक सामना खेळायचा होता.


बीसीसीआयला किती नुकसान सोसावे लागेल?


आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला बीसीसीआयने खेळण्यापासून रोखल्याचा आरोप करत, आता बांगलादेशने २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील आपले सर्व सामने भारताबाहेर हलवण्याची मागणी केली आहे. या निर्णयामुळे बीसीसीआयला कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बीसीसीआयला सात ते ३० कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. परंतु, एकंदरीत बीसीसीआयच्या उत्पन्नाचा आवाका पाहता ही रक्कम एकदम चिल्लर आहे. जर आयसीसीने ही मागणी मान्य केली, तर बीसीसीआयच्या उत्पन्नावर थेट परिणाम होईल. कारण आयसीसी स्पर्धांमधून तिकिटे, प्रसारण आणि केंद्रीय प्रायोजकत्व महसूल थेट बीसीसीआयकडे जात नाही. तर मैदानावरील स्थानिक जाहिराती, तिकीटे घेणाऱ्या प्रेक्षकांना दिल्या जाणाऱ्या खानपानाच्या सेवेतून मिळणारा महसूल आदी उत्पन्नच बीसीसीआयला मिळतो. मुळात पहिल्या फेरीत बांगलादेशचे वेस्ट इंडिज, इटली आणि इंग्लंडविरुद्ध तीन सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आणि एक सामना नेपाळविरोधात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. या सामन्यांतून केवळ इग्लंडच्या सामन्यातून बीसीसीआयला या हॉस्पिटॅलिटीमधून उत्पन्न मिळण्याची आशा होती.

Comments
Add Comment

Lungi Ngidi : लुंगी एनगिडीला रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांचे मानले आभार

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपली पहिली

Badminton New Rules : बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनचा ऐतिहासिक निर्णय! खेळाच्या अनेक नियमांमध्ये बदल

मुंबई : बॅडमिंटनचे सामने आता २१x३ पद्धतीऐवजी १५x३ गुणपद्धतीनुसार खेळले जातील. सामने आता तीन २१x२१ गेम्सऐवजी तीन

RR vs SRH : वैभव सूर्यवंशीचा महाविक्रम, गिलचा विक्रम मोडला

जयपूर : सवाई मानसिंह स्टेडियमवर झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात नाणेफेक

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादचा विजयी चौकार, गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप

जयपूर : इशान मलिंगाच्या नेतृत्वाखालील भेदक गोलंदाजी आणि अभिषेक शर्मा व इशान किशन यांच्यातील शतकी भागीदारीच्या

Lungi Ngidi Injured : दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, लुंगी एनगिडी गंभीर जखमी

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात गंभीर जखमी झाला. झेल

Punjab Kings : पंजाबचा दिल्ली विरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय, सर्वात मोठ्या धावसंख्येचा केला यशस्वी पाठलाग

नवी दिल्ली : पंजाब किंग्सने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात