Lonavla news: भुशी डॅममागील धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले!

पर्यटनासाठी आले आणि...


पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र, गेल्या काही दिवसांत अशाच पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसोबत होत असलेल्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच आता लोणावळ्यातूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोणावळ्यातील भुशी डॅमच्या (Lonawala Bhushi Dam) मागील बाजूस असलेल्या डोंगरातील धबधब्यात पर्यटनाकरता आलेल्या एकाच कुटुंबातील पाचजण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थ तातडीने मदतीकरता आले. सध्या वन्यजीव रक्षक आणि पोलीस यांच्या मदतीने शोधमोहिम सुरू आहे. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागला नाही.


भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून ओळखलं जातं. अन्सारी कुटुंब रविवारी परिवारासोबत वर्षाविहारासाठी या परिसरात आलं होतं. पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा ते आनंद घेत होते. मात्र, पाण्याला वेग असल्याने ते वाहून गेले. एकमेकांना वाचवण्यासाठी प्रयत्नात ते वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. धबधब्यातील पाण्याचा प्रवाह भुशी धरणात येतो, तिथे पाच जणांचं शोधकार्य सुरू आहे. यात लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे.


पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. लोणावळा परिसरात शुक्रवार, शनिवारी झालेल्या जोरदार पावसाच्या सरी आणि आज रविवारी सकाळपासून झालेला पाऊस यामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

Comments
Add Comment

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी

मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १०

Ladaki Bahin Yojna E Kyc : ई-केवायसी न केल्याने लाडकी बहीण योजनेतील ६८ लाख खाती बंद

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य

ऑपरेशन टायगर? : शिवसेनेच्या मेजवानीला ‘उबाठा’च्या खासदारांची हजेरी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बुधवारी रात्री राजधानी

SSC Exam 2026 Major Reform : कागदपत्रांचा गोंधळ संपणार! आता 'मार्कशीट' आणि 'पासिंग सर्टिफिकेट' मिळणार...बोर्डाचा नवीन निर्णय काय ?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक