New Rules : सामान्यांच्या खिशावर परिणाम होणार; जुलैपासून नियमावली बदलणार!

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच १ जुलै २०२४ पासूनही अनेक नियम बदलणार आहेत. ज्यामुळे सामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. सध्या देशातील टेलिकॉम क्षेत्रातील जिओ, एअरटेल, आयडिया व वोडाफोन या कंपन्यांनी रिचार्ज किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आणखी काही गोष्टींच्या सेवेबाबत नियम बदल होणार आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशावर याचा बोजा वाढणार की भार हलका होणार त्याबाबत जाणून घ्या.



सिमकार्ड पोर्ट कालावधी


सिमकार्ड पोर्ट करण्याचा कालावधी कमी करण्यात आला आहे. या आधी ग्राहकांना सिमकार्ड पोर्ट करण्यासाठी तब्बल १० दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र आता सिमकार्ड पोर्ट करून हवे असेल तर फक्त सात दिवसांचा कालावधी लागणार आहे.


काहीवेळा फोन चोरी होतो तेव्हा आपण ते सिम बंद करून दुसरे सिम खरेदी करतो. तर नव्या नियमानुसार तुम्हाला आता नवीन सिम खरेदीसाठी ७ दिवस वाट पहावी लागणार आहे. वाढत असलेल्या चोरींच्या घटनांमुळे TRAI ने हा निर्णय घेतला आहे.



क्रेडिट कार्ड


क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरत असाल तर येथून पुढे भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंटची प्रक्रिया करावी लागेल. सर्व बँकांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत.



गॅस सिलिंडर


प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या LPG सिलेंडर आणि एटीएफच्या किमतीत बदल करतात. त्यात बजेटमध्ये वर्षाला तीन सिलिंडर फ्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे १ जुलैपासून तुम्हाला गॅस सिलिंडरवरही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती