Recharge Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री! जिओ, एअरटेल नंतर VIकडूनही मोठी दरवाढ

जाणून घ्या काय आहे नवीन रिचार्ज प्लॅन


मुंबई : काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओ (Jio) आणि एअरटेल (Airtel) या दोन्ही टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवले होते. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसला होता. मात्र वोडाफोन (Vodafone) आणि आयडियाकडून (Idea) रिजार्ज प्लॅनमध्ये कोणतेही बदल केले नसल्यामुळे या कंपनीच्या वापरकर्त्यांचे सुगीचे दिवस चालू होते. परंतु आता महागाईने सामान्यांना तिन्ही बाजूंनी घेरले असल्याचे चित्र दिसून येत आहे.


वोडाफोन आयडियानेही टॅरिफ प्लान वाढवण्याचा (VI Tariff Hike) निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रीपेड आणि पोस्ट पेड अशा दोन्ही प्लॅन्ससाठी टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ४ जुलैपासून हे नवे दर लागू होणार आहेत. टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरने प्लान्समध्ये १०-२१ टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. त्यामुळे सामान्यांना आता रिचार्ज करणे महाग होणार आहे.



असे असतील रिचार्ज प्लान


४५९ रुपयांचा ८४ दिवसांची वैधता असलेला प्लॅन ५०९ रुपयांचा झाला आहे. ३६५ दिवसांसाठी १७९९ रुपयांचा प्लॅन १९९९ रुपयांचा झाला. २६९ ​​आणि २९९ रुपयांचा २८ दिवसांचा प्लॅन अनुक्रमे २९९ आणि ३४९ रुपयांचा झाला आहे. ३१९ रुपयांचा १ महिन्याचा प्लॅन ३७९ रुपयांचा झाला आहे. डेटा ॲड-ऑन प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, १९ रुपयांचा प्लॅन २२ रुपयांचा आणि ३९ रुपयांचा प्लॅन ४८ रुपयांचा झाला आहे. या प्लॅनची ​​वैधता १ आणि ३ दिवसांची आहे. तर अनलिमिटेड कॉल प्लानबद्दल बोलायचे झाल्यास २८ दिवसांसाठी १७९ रुपयांचा रिचार्ज प्लानसाठी आता १९९ रुपये मोजावे लागणार आहेत.



पोस्ट-पेड प्लानचे रिचार्ज 


पोस्ट-पेड प्लॅनमध्ये ४०१,५०१ रुपयांचे Indivisual Monthly Rental आता ४५१,५५१ रुपये झाले आहे. Family Plan Recharge ६०१, १००१ रुपयांवरून ७०१, १२०१ रुपयांपर्यंत वाढला आहे.



जिओ आणि एअरटेलचे काय आहेत दर?



  • एअरटेलने टॅरिफमध्ये १० ते २१ टक्क्यांपर्यंतची वाढ केली आहे. नवीन प्लाननुसार, आता १७९चा प्लान १९९ रुपयांत मिळणार आहे. प्रीपेड दर दररोज सरासरी ७० पैशांनी वाढले आहेत. पोस्टपेड योजना १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत. ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आता ४४९ रुपयांना मिळणार आहे. हे वाढलेले दर ३ जुलैपासून लागू होतील.

  • रिलायन्स जिओनेही रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. बुधवारी कंपनीने, याबाबत माहिती दिली आहे. जिओकडून सांगण्यात आले की, ३ जुलैपासून रिचार्ज प्लॅन १५ ते २५ टक्क्यांनी महाग होणार आहेत.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१