MSRTC Recruitment : एसटी महामंडळात बंपर भरती! 'या' तारखेआधीच करा अर्ज

लातूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये (MSRTC) नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी मिळत आहे. एसटी महामंडळ अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी मेगाभरती जारी केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि नियंत्रक विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना एसटी महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. अर्ज करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले असल्याने उमेदवारांनी या संधीचा पुरेपूर फायदा करुन घ्यावा, असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.



'या' पदांची भरती


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात समुपदेशक पदासाठी नोकरीची संधी आहे. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक ताणतणावाचे निवारण करणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे यासाठी समुपदेशक पदाची नियुक्ती केली जाणार आहे.



शैक्षणिक पात्रता


या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (M.S.W) किंवा कला शाखेची पदव्युतर पदवी (M.A Psychology) किंवा समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवाराला समुपदेशन क्षेत्रातील शासकीय, खाजगी संस्थामधील किमान २ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.


त्याचबरोबर ही नोकरी मानद तत्त्वावर घेण्यात येणार आहे. यासाठी नेमणुकीचा कालावधी १ वर्षांचा आहे. आवश्यकतेनुसार हा कार्यकाळ वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. लातूरमध्ये ही नोकरीची संधी आहे. १२ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.


याबाबत अधिक माहिती https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Recruitment.aspx या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात