Delhi: दिल्ली एअरपोर्टवर मोठा अपघात, छत कोसळल्याने ४ जण जखमी

नवी दिल्ली: दिल्ली एअरपोर्ट(delhi airport) टर्मिनल १वर छत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. शुक्रवारी सकाळी टर्मिनल १ वर एअरपोर्टचे छत गाडीवर कोसळले. या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. सूचना मिळताच तातडीने तेथे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. दिल्ली फायर सर्व्हिसकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातातून सर्वांना वाचवण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.


दिल्ली फायर सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल १वर छत कोसळले. घटनास्थळी ३ अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करण्यात आल्या. अपघात झाल्यानंतर सुरूवातीला चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती.


 


अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश


फायर सर्व्हिसद्वारे मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजता त्यांना कॉलवर सूचना मिळाली की इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या टर्मिनल १चे छत कोसळले आहे. सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. आतापर्यंत तीन जणांना रुग्णालयात धाडण्यात आले मात्र एक व्यक्ती अडकला होता. त्यालाही वाचवण्यात यश मिळाले.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही