Neet paper leak case : नीट पेपरलीक प्रकरणी बिहारमधून दोघांना अटक

  73

सीबीआयची कारवाई, अनेकांवर टांगती तलवार


पाटणा : नीट पेपरलीक प्रकरणी (Neet paper leak case) सीबीआयने (CBI) आज बिहारमधून (Bihar) पहिली अटक केली आहे. सीबीआयने पाटणा येथून मनीष प्रकाश (Manish Prakash) आणि आशुतोष कुमार (Ashutosh Kumar) या दोघांना अटक केली आहे. यापूर्वी मनीष प्रकाशला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, पेपरफुटीप्रकरणी चिंटू आणि मुकेश या दोन आरोपींना सीबीआयने रिमांडवर घेतले आहे. येत्या काही दिवसात या प्रकरणात अनेकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या मनीष प्रकाश याने आशुतोष कुमारच्या मदतीने नीट परीक्षेच्या एक दिवस आधी (४ मे) बिहारच्या पाटण्यातील एका शाळेतील वसतिगृहात उमेदवारांना बसवून नीट परीक्षेचे पेपर आणि उत्तर पत्रिका दिली होती. सीबीआयने अखेर या दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.


दरम्यान, नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर याविरोधात देशभरातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, दोन आरोपींना आता सीबीआयने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात अनेकांची नावे येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

भारतातील २७ कोटी नागरिक गरिबीतून बाहेर

जागतिक बँकेच्या नव्या अहवालातील माहिती मोदींच्या विविध योजनांचे यश, महाराष्ट्राचा मोठा वाटा नवी दिल्ली :

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व