Zika virus : झिका व्हायरसचा वाढता धोका! आत्ताच जाणून घ्या कशी घ्याल काळजी?

मुंबई : देशभरात पसरलेला कोरोना व्हायरस (Corona Virus) काहीसा नष्ट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र ऐन पावसाळ्यात डेंग्यू (Dengue), मलेरिया, चिकनगुनिया अशा अनेक आजारांनी पुन्हा तोंड वर काढले आहे. त्यातच आणखी एका व्हायरसमुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुण्यात ‘झिका’ (Zika virus) व्हायरसमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या कोथरुड एरंडवणे भागात दोघांना झिकाचा प्रादुर्भाव झाला होता. आता त्यात आणखी एका रुग्णाची भर पडल्याने पुणेकरांची धाकधूक वाढल्याचे दिसून येत आहे.


या आजाराचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ नये यासाठी आतापासूनच काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे. संतुलित आहार या बाबतीत महत्वाची भूमिका बजावतो. पौष्टिकतेने समृद्ध असलेला आहार शरीराला ऊर्जा तर देतोच पण तो आतून आपल्याला निरोगी बनवतो. त्यामुळे जाणून घेऊयात की झिका व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण कशी काळजी घेऊ शकतो.



प्रथिनेयुक्त आहार घ्या


झिका विषाणूची लागण झाल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील स्नायू कमजोर होऊ लागतात. त्यामुळे, रुग्णाला अशक्तपणा जाणवू शकतो. या परिस्थितीमध्ये लवकर बरे होण्यासाठी रुग्णाच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवावे. कारण, प्रथिने शरीरातील पेशी आणि स्नायूंच्या सुधारणेसाठी प्रथिने महत्वाची भूमिका बजावतात. यासाठी तुम्ही आहारात, डाळी, काजू, हिरव्या पालेभाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करू शकता.



शरीर हायड्रेटेड ठेवा


झिका व्हायरसची लागण झाल्यानंतर तुमचे शरीर हायड्रेटेड ठेवणे फार महत्वाचे आहे. निरोगी आरोग्यासाठी आणि कोणत्याही आजारातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी पुरेसे पाणी पिणे फायदेशीर आहे. खास करून जेव्हा तुमचे शरीर एखाद्या संसर्गाशी लढा देत असते, तेव्हा आपल्या शरीराला अधिक प्रमाणात द्रवपदार्थाची आवश्यकता असते. जेणेकरून आपल्या शरीरातील विषारी घटक आणि संसर्ग बाहेर काढता येतील.



द्रवपदार्थांचा आहारात करा समावेश


शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्यासोबतच नारळपाणी, लिंबू पाणी आणि फळांचे ज्यूस इत्यादी द्रवपदार्थाचा आहारात जरूर समावेश करा. तसेच, काकडी आणि संत्र्यांचा आहारात अवश्य समावेश करा. यामध्ये अधिक प्रमाणात पाणी असते. रुग्णाला आजारी पडल्यावर पुरेशी भूक लागत नाही आणि तोंडाची चवही जाते. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने आणि द्रवपदार्थांचा आहारात समावेश केल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

Comments
Add Comment

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह

Air quality monitoring : मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई  : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

मुंबईत मोहरम मिरवणुकीत १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त ! ३००० हजार लोकांचे जीव होते धोक्यात ?

Mumbai: मुंबईच्या भायखळा (Byculla) परिसर

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मध्ये रेल्वे मार्गावर १२ नवीन एसी लोकल धावणार; वेळपत्रक आले समोर

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान एसी लोकलच्या

TET Paper Leak : भिवंडीत दीड कोटींना विकला जात होता टीईटीचा पेपर! पोलिसांच्या 'SIT'कडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

मुंबई : राज्यातील लाखो तरुण-तरुणींच्या भविष्याशी खेळणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य पेपरफुटी रॅकेटचा ठाणे