T-20 world cup 2024: द. आफ्रिकेच्या माऱ्यासमोर अफगाणिस्तानचा संघ ढेपाळला, केवळ ५७ धावांचे दिले आव्हान

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये(t-20 world cup 2024) द. आफ्रिकेला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता केवळ ५७ धावांची आवश्यकता आहे. अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ५६ धावा केल्या.


अफगाणिस्तानच्या कर्णधाराने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा त्यांचा निर्णय त्यांनाच चांगला महागात पडला. आफ्रिकेच्या भेदक माऱ्यापुढे आफगाणिस्तानचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यांचे एकामागून एक विकेट पडतच होते. त्यांना या सामन्यात केवळ ५६ धावाच करता आल्या.


अफगाणिस्तान संघाचा पहिला विकेट रहमानुल्लाह गुरबाजच्या रूपात पडला. तो ४ धावांवर बाद झाला. यानंतर गुलबदिन नायब, इब्राहिम जादरान, मोहम्मद नबी आणि नांगेयालिया खरोटेही स्वस्तात बाद झाले. अफगाणिस्तानकडून अझमतुत्लाह ओमरझाईने सर्वाधिक १० धवा केल्या. तर फलंदाज तर दुहेरी धावाही करू शकले नाहीत.


आफ्रिकेकडून मॅक्रो जेन्सन आणि तबरेज शम्सी यांनी प्रत्येकी ३ विकेट घेत अफगाणिस्तानच्या डावाला सुरूंग लावण्याचे मोठे काम केले. तर कॅगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्टे यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या १८ होळी विशेष गाड्यांची घोषणा

मुंबई : होळी सणाच्या निमित्ताने होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज

Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत.

Big Boss Marathi Season 6 : बिग बॉस मराठी ६ मध्ये आयुषच्या विषयावरून तन्वीची खरडपट्टी; प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : बिग बॉस मराठी ६ मध्ये सातव्या आठवड्यात ड्रामा, आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक उद्रेक यांचा जोर वाढला आहे.

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

श्रद्धेच्या सान्निध्यातील शाश्वततेचा भव्य संकल्प ‘निसर्गायण’

टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच