Thane News : ठाणेकरांवर पाणीबाणी! दुरुस्तीच्या कामांसाठी 'या' तारखेला पाणीपुरवठा बंद

ठाणे : गेल्या महिन्यात कडाक्याच्या उन्हामुळे (Heat) अनेक शहरांना पाणीबाणीच्या समस्यांना सामोरे जावे लागले होते. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर पाणीसंकटाचे (Water crisis) सावट ओढावले होते. त्यामुळे प्रत्येक नागरिक मान्सूनची (Monsoon) आतूरतेने वाट पाहत होता. त्यातच जून महिन्याला सुरुवात होताच राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली. मात्र ऐन पावसाळ्यातही अनेक जिल्ह्यांवर पाणीकपातीचे (Water Shortage) संकट सुरुच असल्याचे दिसून येते. अशातच दुरुस्तीच्या कामांसाठी ठाणेकरांनाही पुन्हा एक दिवसासाठी पाणी येणार नसल्याने पाण्याचा साठा करुन ठेवावा लागणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे परिसरातील काही भागात २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा ठाणे महापालिकेकडून करण्यात आली आहे. जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी हा निर्णय घेतला आहे. उद्या म्हणजेच गुरुवार २७ जून रोजी सकाळी १२ ते शुक्रवार २८ जूनपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, तसेच पाणी भरून ठेवावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.



'या' भागात पाणीपुरवठा बंद


काटई नाका ते शीळ टाकी या बारवी गुरुत्व जलवाहिनेचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका हद्दीतील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा, वागळे या भागातील पाणीपुरवठा ठप्प होईल. त्याचबरोबर प्रभावित झालेल्या प्रमुख भागांमध्ये दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक २६ आणि ३१ मधील भाग वगळता), कळवा, रूपादेवी पाडा, किसान नगर क्रमांक १, नेहरू नगर आणि कोलशेत याभागातही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेने सांगितले.

Comments
Add Comment

लक्ष्य सेनची जपान मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा सहज पराभव नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुममातो

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात सुरू झाली 'सोलर शाळा'

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य आणि ‘रोझी ब्लू

नाशिक जिल्हा परिषदेची नूतन इमारत गतिमान कारभारासाठी उपयुक्त ठरेल : मुख्यमंत्री

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन

नाशिक : केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल

किआ इंडियाने किआ आणि मल्टीब्रँड वाहनांसाठी नवीन वॉरंटी प्लॅनसह व्यवसायात मजबूती नोंदवली

किआ इंडियाने किआ मेक प्री-मालकीच्या कारचे प्रमाणपत्र वय ५ वर्षांवरून ७ वर्षांपर्यंत वाढवले आहे, २४ महिने किंवा