Thane News : ठाणेकरांवर पाणीबाणी! दुरुस्तीच्या कामांसाठी 'या' तारखेला पाणीपुरवठा बंद

ठाणे : गेल्या महिन्यात कडाक्याच्या उन्हामुळे (Heat) अनेक शहरांना पाणीबाणीच्या समस्यांना सामोरे जावे लागले होते. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर पाणीसंकटाचे (Water crisis) सावट ओढावले होते. त्यामुळे प्रत्येक नागरिक मान्सूनची (Monsoon) आतूरतेने वाट पाहत होता. त्यातच जून महिन्याला सुरुवात होताच राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली. मात्र ऐन पावसाळ्यातही अनेक जिल्ह्यांवर पाणीकपातीचे (Water Shortage) संकट सुरुच असल्याचे दिसून येते. अशातच दुरुस्तीच्या कामांसाठी ठाणेकरांनाही पुन्हा एक दिवसासाठी पाणी येणार नसल्याने पाण्याचा साठा करुन ठेवावा लागणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे परिसरातील काही भागात २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा ठाणे महापालिकेकडून करण्यात आली आहे. जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी हा निर्णय घेतला आहे. उद्या म्हणजेच गुरुवार २७ जून रोजी सकाळी १२ ते शुक्रवार २८ जूनपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, तसेच पाणी भरून ठेवावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.



'या' भागात पाणीपुरवठा बंद


काटई नाका ते शीळ टाकी या बारवी गुरुत्व जलवाहिनेचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिका हद्दीतील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा, वागळे या भागातील पाणीपुरवठा ठप्प होईल. त्याचबरोबर प्रभावित झालेल्या प्रमुख भागांमध्ये दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक २६ आणि ३१ मधील भाग वगळता), कळवा, रूपादेवी पाडा, किसान नगर क्रमांक १, नेहरू नगर आणि कोलशेत याभागातही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेने सांगितले.

Comments
Add Comment

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित

अक्षया नाईकचं ओटीटीवर पदार्पण

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. तिच्या सोशल मीडिया