मुंबई : नारायण राणे (Narayan Rane) यांनी संसदेत खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचे पुत्र कोकणातील भाजपा नेते व माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक भावनिक पोस्ट ‘एक्स’वर शेअर केली आहे. तुम्हाला सगळी पदे सहज मिळाली नाहीत, तुम्ही केलेला संघर्ष पाहिला, तुमच्यातला खरा माणूस अनेकांना कळलाच नाही, अशा भावना निलेश राणे यांनी व्यक्त केल्या. तसेच खासदारकीची पाच वर्षे जीव तोडून कोकणासाठी काम करणार असल्याचेही निलेश राणे यांनी सांगितले. भाजपाचे नवनियुक्त खासदार नारायण राणे यांनी संसदेत खासदारपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणेंनी एक पोस्ट लिहून नारायण राणेंचा नगरसेवक, आमदार ते खासदारकीपर्यंतचा प्रवास मांडला.ढ़
१९८५ नगरसेवक, १९९० ते २०१४ सलग सहा वेळा आमदार (१ पोटनिवडणूक), २०१४ ते २०२४ विधान परिषद १ वेळा, राज्यसभा १ वेळा आणि २०२४ आज लोकसभा खासदार. ही सगळी पदे सहज आली नाहीत, त्यासाठी तुम्ही किती संघर्ष केला, ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही. तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथंपर्यंत आलो, मलाच कळले नाही. पण तुम्हाला जरी नाही कळले तरी ते आम्हाला दिसले. इतकी लोकं इतके वर्षे जोडून ठेवणे सोपे नाही.
जीवनात सरळ काहीच मिळत नाही, हे आम्हाला समजले. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही की निलेश, नितेशला सांभाळा. कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला, त्याला सांभाळायची गरज नाही. कोकणाने आणि खासकरून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्षं जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार. तुम्ही आहात म्हणून हे सगळे शक्य आहे.
रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संसदेत खासदार पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर सोशल मीडियावर नारायण राणे यांनी व्यक्त होत कोकणच्या निरंतर विकासासाठी आणि विकसित भारताच्या उभारणीच्या ध्येयासाठी स्वत:ला समर्पित करत असल्याचे स्पष्ट केले.
ते म्हणाले, आज १८व्या लोकसभेत लोकसभेचा खासदार म्हणून शपथ घेताना मला मोठा आनंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, मी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निरंतर विकासासाठी आणि विकसित भारताच्या उभारणीच्या ध्येयासाठी स्वत:ला समर्पित करण्याची शपथ घेतो.
जय हिंद!
जय महाराष्ट्र !!
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…