Mumbai Accident : भीषण अपघात! आजोबा व नातीला बोरीवलीत भरधाव बसने चिरडले!

चिमुकलीचा जागीच मृत्यू तर आजोबा गंभीर जखमी


मुंबई : देशभरात मागील काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवसागणित किरकोळ तसेच गंभीर स्वरुपाचे अपघात घडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच मुंबईतील बोरिवली (Mumbai Borivali Accident) परिसरात आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. भरधाव बेस्ट बसने (Best Bus) एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला असून आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत चिमुकली आपल्या आजोबा नवलकिशोर प्रमोद आंबिका प्रसाद सिंग यांच्यासोबत दुचाकीवरून जात होती. बोरिवली रोडवरील शिंपोली रोड इटोपिया टॉवर येथे दुचाकी आली असता, पाठीमागून आलेल्या बेस्ट बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की बसने दुचाकीला दूर फटफटत नेले. यामध्ये चिमुकलीच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर आजोबा गंभीर जखमी झाले आहेत.


दरम्यान, अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. बोरिवली पोलिसांनी बेस्ट बस चालक सागर तुलसीदास कोळी (३७) याला अटक केली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण

माहिम किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करणार : अ‍ॅड आशिष शेलार

मुंबई : माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात

BMC : गुडन्यूज मुंबईकरांनो! मुंबई मनपाची ‘म्हाडा स्टाईल’ योजना, ४२६ घरं कमी दरात मिळवण्याची सुवर्णसंधी!

मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आता

सायबर हल्ल्याच्या भीतीने मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, विभागांना केल्या अशा सूचना

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे कामकाज संगणक प्रणालीद्वारेच केले जात असल्याने या अद्ययावत तंत्रज्ञान आणि

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय