LPG Cylinder: किचनमध्ये गॅस लीक झाल्यास लगेचच करा हे काम

मुंबई: देशांतील कोट्यावधी घरांमध्ये आज एलपीजी गॅस सिलेंडरचा वापर केला जात आहे. यामुळे महिलांचे आयुष्य अतिशय सोपे झाले आहे. एकीकडे गॅस सिलेंडर एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. मात्र दुसरीकडे निष्काळजीपणा केल्यास अनेकदा गॅस सिलेंडर जीवघेणा ठरू शकतो. अनेकदा घरांमध्ये गॅस सिलेंडर लीकेज होतो. अशातच याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.



पेट्रोलियम तसेच प्राकृतिक गॅस मंत्रालयाने दिले आश्वासन


पेट्रोलियम तसेच प्राकृतिक गॅस मंत्रालयाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर याबाबत माहिती देताना लोकांना सांगितले की गॅस लीकेजच्या स्थितीत काय केले पाहिजे. यासोबतच लोकांना मदतीसाठी एक एमर्जन्सी नंबर दिला आहे.



गॅस लीकेज असल्यास इमर्जन्सी सर्व्हिस नंबर १९०६वर करा कॉल


पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार जर तुमच्या घरात गॅस लीकेज होत असेल तर अशा स्थितीत घाबरू नका. स्वत:ला शांत ठेवा. यानंतर सगळ्यात आधी आपल्या गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर बंद करा. गॅस सिलेंडर बंद केल्यास गॅस गळती रोखली जाऊ शकते.


यानंतर गॅस गळती इमर्जन्सी सर्व्हिस नंबर १९०६वर कॉलर करा. मंत्रालयाच्या माहितीनुसार इमर्जन्सी नंबर १९०६ वर कॉल केल्यास दोन ते चार तासांच्या आत तुमचा त्रास दूर होऊ शकतो.

Comments
Add Comment

वेध निवडणुकीचे : धारावीमध्ये फुलणार भाजपचे कमळ

मुंबई(सचिन धानजी) : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील धारावी विधानसभा क्षेत्रात भाजपचा एकही नगरसेवक निवडून

'अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावरील उड्डाणपुलाच्‍या बांधकामामुळे बाधित होणा-या पात्र रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा'

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे प्रत्‍यक्ष पाहणी दौ-यादरम्‍यान निर्देश मुंबई (खास

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील जैव खाणकामासाठी नवयुग इंजिनिअरींगची निवड

बायोमायनिंग प्रकल्पासाठी तब्बल ३०३५ कोटी रुपये होणार खर्च मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने देवनार

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या