आफ्रिका-अफगाणिस्तान सामना पावसाने रद्द झाला तर कोण जाणार फायनलमध्ये? जाणून घ्या

मुंबई: टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) पहिला सेमीफायनल सामना २७ जूनला सकाळी ६ वाजता अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे. तर दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात २७ जूनला रात्री ८ वाजता गयानामध्ये खेळवला जाईल.


अशातच सवाल हा आहे की जर या सेमीफायनलमध्ये पाऊस आला आणि खराब हवामानामुळे सामना रद्द झाला तर अखेर फायनलमध्ये कोण खेळेल?


अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यासाठी ४ तास १० मिनिटांचा एक्स्ट्रा वेळ ठेवण्यात आला आहे. येथे कोणताही रिझर्व्ह डे नाही.


जर पावसामुळे सामना रद्द झाला तर सुपर ८मध्ये टॉपमधील संघ फायनलमध्ये पोहोचेल. म्हणजेच सेमीफायनलचा कोणताही निकाल समोर आला नाही तर ग्रुप १मध्ये टॉपवर राहणारा भारत आणि ग्रुप २मध्ये टॉपवर राहणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ फायनलमध्ये खेळतील.


पहिल्या सेमीफायनलमध्ये दिवसाच्या खेळाच्या शेवटी अतिरिक्त ६० मिनिटे आणि रिझर्व्ह डेला १९० मिनिटे असतील. तर रिझर्व्ह डेला खेळ तिथूनच सुरू होईल जिथे संपला होता.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून