आफ्रिका-अफगाणिस्तान सामना पावसाने रद्द झाला तर कोण जाणार फायनलमध्ये? जाणून घ्या

मुंबई: टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) पहिला सेमीफायनल सामना २७ जूनला सकाळी ६ वाजता अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे. तर दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात २७ जूनला रात्री ८ वाजता गयानामध्ये खेळवला जाईल.


अशातच सवाल हा आहे की जर या सेमीफायनलमध्ये पाऊस आला आणि खराब हवामानामुळे सामना रद्द झाला तर अखेर फायनलमध्ये कोण खेळेल?


अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यासाठी ४ तास १० मिनिटांचा एक्स्ट्रा वेळ ठेवण्यात आला आहे. येथे कोणताही रिझर्व्ह डे नाही.


जर पावसामुळे सामना रद्द झाला तर सुपर ८मध्ये टॉपमधील संघ फायनलमध्ये पोहोचेल. म्हणजेच सेमीफायनलचा कोणताही निकाल समोर आला नाही तर ग्रुप १मध्ये टॉपवर राहणारा भारत आणि ग्रुप २मध्ये टॉपवर राहणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ फायनलमध्ये खेळतील.


पहिल्या सेमीफायनलमध्ये दिवसाच्या खेळाच्या शेवटी अतिरिक्त ६० मिनिटे आणि रिझर्व्ह डेला १९० मिनिटे असतील. तर रिझर्व्ह डेला खेळ तिथूनच सुरू होईल जिथे संपला होता.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना