आफ्रिका-अफगाणिस्तान सामना पावसाने रद्द झाला तर कोण जाणार फायनलमध्ये? जाणून घ्या

  91

मुंबई: टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) पहिला सेमीफायनल सामना २७ जूनला सकाळी ६ वाजता अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे. तर दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात २७ जूनला रात्री ८ वाजता गयानामध्ये खेळवला जाईल.


अशातच सवाल हा आहे की जर या सेमीफायनलमध्ये पाऊस आला आणि खराब हवामानामुळे सामना रद्द झाला तर अखेर फायनलमध्ये कोण खेळेल?


अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. तर भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यासाठी ४ तास १० मिनिटांचा एक्स्ट्रा वेळ ठेवण्यात आला आहे. येथे कोणताही रिझर्व्ह डे नाही.


जर पावसामुळे सामना रद्द झाला तर सुपर ८मध्ये टॉपमधील संघ फायनलमध्ये पोहोचेल. म्हणजेच सेमीफायनलचा कोणताही निकाल समोर आला नाही तर ग्रुप १मध्ये टॉपवर राहणारा भारत आणि ग्रुप २मध्ये टॉपवर राहणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ फायनलमध्ये खेळतील.


पहिल्या सेमीफायनलमध्ये दिवसाच्या खेळाच्या शेवटी अतिरिक्त ६० मिनिटे आणि रिझर्व्ह डेला १९० मिनिटे असतील. तर रिझर्व्ह डेला खेळ तिथूनच सुरू होईल जिथे संपला होता.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी