Grampanchayat protest : ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने विधानभवनावर आक्रोश मोर्चा

  181

बच्चू कडू करणार नेतृत्व; काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या?


ठाणे : कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत असलेल्या अनेक समस्या तसेच भरती प्रक्रिया अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या (Maharashtra Gram Panchayat Employee Union) वतीने विधानभवनावर (Vidhanbhavan) आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील २७ हजार ९२० ग्रामपंचायती मधील ६० हजार कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शुक्रवार, २८ जून रोजी हा मोर्चा काढणार असल्याची माहिती कर्मचारी युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय भोईर यांनी भिवंडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कर्मचारी युनियनचे प्रदेशाध्यक्ष आमदार बच्चू कडू या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.



काय आहेत कर्मचारी संघटनेच्या मागण्या?



  • ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करावी.

  • ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावे.

  • किमान वेतनाच्या अनुदानाची १९ महिन्यांची थकीत रक्कम तात्काळ मिळावी.

  • ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत असलेली वसुलीची अट रद्द करावी. ग्रामपंचायत

  • कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करावी.

  • ग्रामपंचायत कर्मचारी दहा टक्के आरक्षणानुसार भरती करत असताना दरवर्षीच्या रिक्त पदावर अनुकंपाचे धरतीवर करावी.


महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आलेल्या विविध मागण्या या अद्याप प्रलंबित आहेत. युनियनच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी केलेल्या आंदोलन प्रसंगी शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे या आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे असं संघटनेचं म्हणणं आहे. यानंतरही आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आंदोलन अधिक उग्र करीत मुंबई येथे आमरण उपोषण सुरू करून राज्यातील ग्रामपंचायती कर्मचारी बेमुदत संप पुकारतील असा इशारा दत्तात्रय भोईर यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या

साई बाबांचा प्रसाद महागला! दरवाढीमुळे जनसामान्यांमध्ये नाराजी

अहिल्यानगर: शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला दररोज लाखों भाविक शिर्डीत येतात. साईबाबांचे दर्शन घेऊन घरी

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल