IND vs AUS: टी-२० वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय अर्शदीप सिंह, सांगतात हे आकडे

मुंबई: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला २४ धावांनी हरवले. या विजयानंतर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने २० षटकांत ५ बाद २०५ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला केवळ २० षटकांत ७ बाद १८१ धावा करता आल्या.


भारतासाठी रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली त्यानंतर अर्शदीप सिंहने गोलंदाजीत दम दाखवला. अर्शदीप सिंहने ४ षटकांत ३७ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या ३ फलंदाजांना माघारी धाडले. या गोलंदाजाने डेविड वॉर्नरशिवाय टीम डेविड आणि मॅथ्यू वेड यांना बाद केले.


या टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सिंह अफगाणिस्तानच्या फलउल्लाह फारूखीसोबत टॉपवर पोहोचला आहे. या दोन गोलंदाजांच्या नावावर १५-१५ विकेट आहेत.यानंतर बांगलादेशता रिशाद हौसेन आहे. या खेळाडूच्या नावावर १४ सामन्यांत १३.८६च्या सरासरीने १५ विकेट आहे. ऑस्ट्रेलियाचा अॅडम झाम्पा आणि वेस्ट इंडिजच्या अल्जारी जोसेफने प्रत्येकी १३ विकेट घेतल्या आहेत. या पद्धतीने सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप ५ गोलंदाजांच्या यादीत अर्शदीपचे नाव घेतले जाते.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना