Gold Price: १९६४मध्ये इतका होता सोन्याचा दर, आता ११३० पटींनी वाढले दर

Share

मुंबई: सोन्याच्या दरात गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. वर्ष १९६४पासून ते आतापर्यंत सोन्याच्या दरात कित्येक पटींनी वाढ झाली आहे.

जुन्या काळापासून सोन्यातील गुंतवणूक ही अतिशय शुभ मानली जाते. आजही सोन्याची क्रेझ काही कमी होत नाही आहे. मात्र वेळेनुसार सोन्याचे दरही गगनाला भिडले आहे.

आज भारतात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने ७१,७४३ रूपयांवर पोहोचला आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे की एक वेळ अशी होती की जेव्हा देशात सोने १०० रूपयांपेक्षाही कमी होते.

१९६४ वर्षांपासून ते आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत अनेक पटींनी वाढ झाली आहे. मिळालेल्या डेटानुसार १९६४मध्ये भारतात सोन्याची किंमत ६३.२५ रूपये तोळे इतकी होती.

अशातच तेव्हापासून ते आतापर्यंत जर सोन्याच्या दरांची तुलना केली तर या किंमतीत मोठे अंतर दिसते.

सोन्याच्या दरात १९६४ नंतर आतापर्यंत तब्बल ११३० पटींनी वाढ झाली आहे. साधारणपणे सोन्यामध्ये गुंतवणुकीला संपूर्ण जगभरात पसंती दिली जाते. आता जगभरातील बाजारांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये उलथापालथ होते तेव्हा लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करणे अधिक पसंत करतात.

१९७०मध्ये सोन्याचे दर १८४ रूपये, १९८०मध्ये १३३० रूपये, १९९०मध्ये ३२०० रूपये, २०००मध्ये ४,४००, २०१०मध्ये १८५००, २०२०मध्ये ४८,६७१ रूपये प्रती तोळा होते.

Tags: gold rates

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

1 hour ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

3 hours ago