Gold Price: १९६४मध्ये इतका होता सोन्याचा दर, आता ११३० पटींनी वाढले दर

मुंबई: सोन्याच्या दरात गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. वर्ष १९६४पासून ते आतापर्यंत सोन्याच्या दरात कित्येक पटींनी वाढ झाली आहे.


जुन्या काळापासून सोन्यातील गुंतवणूक ही अतिशय शुभ मानली जाते. आजही सोन्याची क्रेझ काही कमी होत नाही आहे. मात्र वेळेनुसार सोन्याचे दरही गगनाला भिडले आहे.


आज भारतात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने ७१,७४३ रूपयांवर पोहोचला आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे की एक वेळ अशी होती की जेव्हा देशात सोने १०० रूपयांपेक्षाही कमी होते.


१९६४ वर्षांपासून ते आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत अनेक पटींनी वाढ झाली आहे. मिळालेल्या डेटानुसार १९६४मध्ये भारतात सोन्याची किंमत ६३.२५ रूपये तोळे इतकी होती.


अशातच तेव्हापासून ते आतापर्यंत जर सोन्याच्या दरांची तुलना केली तर या किंमतीत मोठे अंतर दिसते.


सोन्याच्या दरात १९६४ नंतर आतापर्यंत तब्बल ११३० पटींनी वाढ झाली आहे. साधारणपणे सोन्यामध्ये गुंतवणुकीला संपूर्ण जगभरात पसंती दिली जाते. आता जगभरातील बाजारांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये उलथापालथ होते तेव्हा लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करणे अधिक पसंत करतात.


१९७०मध्ये सोन्याचे दर १८४ रूपये, १९८०मध्ये १३३० रूपये, १९९०मध्ये ३२०० रूपये, २०००मध्ये ४,४००, २०१०मध्ये १८५००, २०२०मध्ये ४८,६७१ रूपये प्रती तोळा होते.

Comments
Add Comment

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची