Gold Price: १९६४मध्ये इतका होता सोन्याचा दर, आता ११३० पटींनी वाढले दर

मुंबई: सोन्याच्या दरात गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. वर्ष १९६४पासून ते आतापर्यंत सोन्याच्या दरात कित्येक पटींनी वाढ झाली आहे.


जुन्या काळापासून सोन्यातील गुंतवणूक ही अतिशय शुभ मानली जाते. आजही सोन्याची क्रेझ काही कमी होत नाही आहे. मात्र वेळेनुसार सोन्याचे दरही गगनाला भिडले आहे.


आज भारतात मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने ७१,७४३ रूपयांवर पोहोचला आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे की एक वेळ अशी होती की जेव्हा देशात सोने १०० रूपयांपेक्षाही कमी होते.


१९६४ वर्षांपासून ते आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत अनेक पटींनी वाढ झाली आहे. मिळालेल्या डेटानुसार १९६४मध्ये भारतात सोन्याची किंमत ६३.२५ रूपये तोळे इतकी होती.


अशातच तेव्हापासून ते आतापर्यंत जर सोन्याच्या दरांची तुलना केली तर या किंमतीत मोठे अंतर दिसते.


सोन्याच्या दरात १९६४ नंतर आतापर्यंत तब्बल ११३० पटींनी वाढ झाली आहे. साधारणपणे सोन्यामध्ये गुंतवणुकीला संपूर्ण जगभरात पसंती दिली जाते. आता जगभरातील बाजारांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये उलथापालथ होते तेव्हा लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करणे अधिक पसंत करतात.


१९७०मध्ये सोन्याचे दर १८४ रूपये, १९८०मध्ये १३३० रूपये, १९९०मध्ये ३२०० रूपये, २०००मध्ये ४,४००, २०१०मध्ये १८५००, २०२०मध्ये ४८,६७१ रूपये प्रती तोळा होते.

Comments
Add Comment

Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

मुंबई: रविवार १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या

Budget 2026 : ‘विकसित भारताच्या दिशेने दमदार पाऊल’; केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : देशाचा २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026 ) सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र