Loksabha: भाजप आणि काँग्रेसने आपल्या खासदारांना जारी केला व्हिप, लोकसभेत हजर राहण्याचे आदेश

नवी दिल्ली: संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान लोकसभा सभापतींची निवडणूक होणार आहे. याबाबत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये दुमत आहे. ही निवडणूक उद्या म्हणजेच बुधवारी होणार आहे. याचमुळे लोकसभेत आपल्या खासदारांना २६ जूनला सदनात उपस्थित राहण्यासीठ तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे.


काँग्रेस संसदीय दलाकडून खासदारांना लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की उद्या लोकसभेत खूप महत्त्वाचा मुद्दा उचलला जाईल. लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना निवेदन केले जाते की कृपया सकाळी ११ वाजल्यापासून सदनात उपस्थित राहावे. हा मेसेज महत्त्वाचा आहे. काँग्रेसकडून हे व्हि के सुरेश यांनी जारी केले आहे. ते विरोधी पक्षाकडून लोकसभेच्या सभापतीपदाचे उमेदवार आहेत.


 


तर भाजपने आपल्या खासदारांना व्हिप जारी करत बुधवारी लोकसभा सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.



लोकसभा सभापतीपदासाठी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये मतभेद


१८व्या लोकसभेत १९५२ नंतर पहिल्यांदा सभापती पदासाठी हे युद्ध पाहायला मिळत आहे. एनडीएकडून ओम बिर्ला यांचा सामना इंडिया ब्लॉकच्या के सुरेश यांच्याशी आहे. सुरूवातीला अध्यक्षपदासाठी भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आणि विरोधी पक्ष यांच्यात सहमती होत होती मात्र विरोधी पक्षाने मागणी केली की उपसभापती पद त्यांना दिले गेले पाहिजे. मात्र एनडीएने सशर्त समर्थन स्वीकारण्यास नकार दिला.

Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या