Loksabha speaker : स्वातंत्र्यानंतर लोकसभा अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच होणार निवडणूक!

सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर


नवी दिल्ली : लोकसभा निकालानंतर (Loksabha result) आता एनडीएचं सरकार (NDA government) स्थापन झालं असून खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. आता लोकसभेतील अध्यक्षनिवडीची प्रक्रिया (Lok Sabha Speaker Election) होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यंदा स्वातंत्र्यांनतर इतिहासामध्ये पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षामध्ये एकमत न झाल्याने निवडणुकीचा निर्णय घेतला गेला आहे. अन्यथा याआधीचे सर्व उमेदवार हे बिनविरोध निवडून आले होते.


लोकसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाने उमेदवारांची नावेही जाहीर केली आहेत. सत्ताधारी एनडीएकडून ओम बिर्ला (Om Birla) तर विरोधी इंडिया आघाडीकडून (INDIA Alliance) के सुरेश (K. Suresh) यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. सुरुवातीला इंडिया आघाडीने एनडीएच्या उमेदवाराला (NDA Candidate) पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र त्यासाठी एक अट समोर ठेवली होती. उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावे, अशी ती अट होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी ही अट मान्य न केल्याने विरोधी आघाडीने थेट आपला उमेदवार लोकसभा अध्यक्षपदासाठी उभा केला.


काँग्रेसचे केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, 'विरोधकांचा जर उपाध्यक्ष नसेल तर पाठिंबा देण्याऐवजी आम्ही अध्यक्षपदासाठी आमचाच उमेदवार उभा करू. अशा स्थितीत विरोधी पक्षाकडून के सुरेश यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले. ' दरम्यान, ओम बिर्ला आणि के सुरेश या दोघांनीही आज लोकसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. तर उद्या निवडणूक पार पडणार आहे.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही