मुंबई: खराब खाणेपिणे तसेच दिनचर्येमुळे आजकाल लठ्ठपणा वाढत चालला आहे. यामुळे बॉडीचा आकारही बिघडून जातो. वजन कमी करण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करत असतात मात्र जाणते-अजाणतेपणी अशा काही चुका होतात ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी ते वाढतच जाते.
सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे आपण जे काही हेल्दी खातो त्यामुळे वजन वाढणार नाही. खरंतर शरीरात कॅलरीज वाढल्या की वजन वाढू शकता. मग भले ही हेल्दी जरी खात असले तरी नेहमी संतुलित प्रमाणात खाल्ले पाहिजे.
वजन कमी करायचे केवळ खाण्यापिण्यात सुधारणा करून काम चालणार नाही. यासाठी एक्सरसाईजही तितकीच महत्त्वाची असते. व्यायाम केल्याने कॅलरीज बर्न होतात मांसपेशी मजबूत यामुळे मेटाबॉलिज्म वाढतो.
अनेक लोक कॅलरीज कमी करण्यासाठी भूक लागल्यानंतरही खात नाहीत मात्र हे बिल्कुल योग्य नाही. भूक मिटवण्यासाठी काही जण एकाच वेळेस भरपूर खातात मात्र यामुळे वजन वाढू शकते. दिवसभर थोडे थोडे हेल्दी खाल्ले पाहिजे.
वजन कमी करण्याच्या नादात अनेक लोक संतुलित खाणे खात नाहीत. याचा फोकस कॅलरीज ठेवण्यावर असतो. मात्र शरीराला चांगले बनवण्यासाठी विविध पोषकतत्वांची गरज असते. यात प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनरल्सच्या कमतरतेमुळे मेटाबॉलिज्म स्लो होऊ शकतो. यामुळे बॉडीमध्ये फॅट जमा होऊ लागतात.
काही पदार्थ हेल्दी असतात मात्र त्यात असे काही मिसळले जाते ज्यामुळे ते अनहेल्दी बनतात. यामुळे कॅलरीज वाढतात आणि फॅट वेगाने वाढते.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…