weight loss: करू नका या ५ चुका, नाहीतर कमी होण्याऐवजी वाढेल वजन

मुंबई: खराब खाणेपिणे तसेच दिनचर्येमुळे आजकाल लठ्ठपणा वाढत चालला आहे. यामुळे बॉडीचा आकारही बिघडून जातो. वजन कमी करण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करत असतात मात्र जाणते-अजाणतेपणी अशा काही चुका होतात ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी ते वाढतच जाते.



अधिक खाणे


सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे आपण जे काही हेल्दी खातो त्यामुळे वजन वाढणार नाही. खरंतर शरीरात कॅलरीज वाढल्या की वजन वाढू शकता. मग भले ही हेल्दी जरी खात असले तरी नेहमी संतुलित प्रमाणात खाल्ले पाहिजे.



केवळ खाण्या-पिण्यात सुधारणा


वजन कमी करायचे केवळ खाण्यापिण्यात सुधारणा करून काम चालणार नाही. यासाठी एक्सरसाईजही तितकीच महत्त्वाची असते. व्यायाम केल्याने कॅलरीज बर्न होतात मांसपेशी मजबूत यामुळे मेटाबॉलिज्म वाढतो.



खाणे सोडून देणे


अनेक लोक कॅलरीज कमी करण्यासाठी भूक लागल्यानंतरही खात नाहीत मात्र हे बिल्कुल योग्य नाही. भूक मिटवण्यासाठी काही जण एकाच वेळेस भरपूर खातात मात्र यामुळे वजन वाढू शकते. दिवसभर थोडे थोडे हेल्दी खाल्ले पाहिजे.



पोषकतत्वे असलेले खाणे न खाणे


वजन कमी करण्याच्या नादात अनेक लोक संतुलित खाणे खात नाहीत. याचा फोकस कॅलरीज ठेवण्यावर असतो. मात्र शरीराला चांगले बनवण्यासाठी विविध पोषकतत्वांची गरज असते. यात प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनरल्सच्या कमतरतेमुळे मेटाबॉलिज्म स्लो होऊ शकतो. यामुळे बॉडीमध्ये फॅट जमा होऊ लागतात.



हेल्दी पदार्थांना अनहेल्दी बनवणे


काही पदार्थ हेल्दी असतात मात्र त्यात असे काही मिसळले जाते ज्यामुळे ते अनहेल्दी बनतात. यामुळे कॅलरीज वाढतात आणि फॅट वेगाने वाढते.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि