T-20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाला हरवत भारत टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सेमीफायनलमध्ये

  94

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८ मधील सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला २४ धावांनी हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश घेतला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला हरवत २०२३च्या वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचा बदला घेतला.


रोहित शर्माची दमदार खेळी आणि स्पिनर्सची कमाल यामुळेच भारताला हा विजय साकारता आला. भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली. अर्शदीप सिंहने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने २ विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.


याआधी भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत २०५ धावा केल्या होत्या. या सामन्यात रोहितने तडाखेबंद खेळी साकारली. त्याने ४१ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह ९२ धावा तडकावल्या.


विराट कोहली या सामन्यात पुन्हा शून्यावर बाद झाला. त्याची शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ. ऋषभ पंतही १५ धावांवर परतला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने १६ बॉलमध्ये ३१ धावांची पटापट खेळी केली. तर शिवम दुबेने २२ बॉलमध्ये २८ धावा केल्या. हार्दिक पांड्याने १७ बॉलमध्ये नाबाद २७ धावांची खेळी केली.


१४व्या षटकापर्यंत टीम इंडियाची धावसंख्या ३ बाद १५५ इतकी होती. मात्र शेवटच्या ६ षटकांत केवळ ५० धावाच बनू शकल्या.


भारताच्या या विजयासह आता सेमीफायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होणार आहे. २७ जूनला हा सामना रंगणार आहे.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे