मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८ मधील सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला २४ धावांनी हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश घेतला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला हरवत २०२३च्या वर्ल्डकप फायनलमधील पराभवाचा बदला घेतला.
रोहित शर्माची दमदार खेळी आणि स्पिनर्सची कमाल यामुळेच भारताला हा विजय साकारता आला. भारताच्या गोलंदाजांनी कमाल केली. अर्शदीप सिंहने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवने २ विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.
याआधी भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत २०५ धावा केल्या होत्या. या सामन्यात रोहितने तडाखेबंद खेळी साकारली. त्याने ४१ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह ९२ धावा तडकावल्या.
विराट कोहली या सामन्यात पुन्हा शून्यावर बाद झाला. त्याची शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ. ऋषभ पंतही १५ धावांवर परतला. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने १६ बॉलमध्ये ३१ धावांची पटापट खेळी केली. तर शिवम दुबेने २२ बॉलमध्ये २८ धावा केल्या. हार्दिक पांड्याने १७ बॉलमध्ये नाबाद २७ धावांची खेळी केली.
१४व्या षटकापर्यंत टीम इंडियाची धावसंख्या ३ बाद १५५ इतकी होती. मात्र शेवटच्या ६ षटकांत केवळ ५० धावाच बनू शकल्या.
भारताच्या या विजयासह आता सेमीफायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी होणार आहे. २७ जूनला हा सामना रंगणार आहे.
नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…
कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…
बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार.…
जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला मुंबई : 'विधीमंडळ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा…
हाथरस : उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली असून यामध्ये १२२ जणांचा…